Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काही उद्योगपतींना झुकतं माप दिल्याने देशाची अर्थव्यवस्था धोक्यात, काँग्रेसच्या महाअधिवेशनात सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका

काही मोजक्या उद्योगपतींना झुकतं माप दिल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. सध्या अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या.

  • By साधना
Updated On: Feb 25, 2023 | 01:51 PM
sonia gandhi in raipur

sonia gandhi in raipur

Follow Us
Close
Follow Us:

रायपूर: काँग्रेसच्या (Congress) नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आज रायपूरमध्ये (Raipur) पक्षाच्या महा अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यांनी सांगितलं की काँग्रेस फक्त राजकीय पक्ष नसून लोकांसाठीच व्यासपीठ आहे. आम्ही 10 वर्ष मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात प्रामाणिक आणि चांगलं सरकार दिलं होतं. आम्ही लोकशाही मजबूत करण्यासाठी तयार आहोत. भारत जोडो यात्रेचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

This is a challenging time for Congress & the country as a whole. BJP-RSS has captured and subverted every single institution in the country. It has caused economic ruin by favouring a few businessmen: Cong MP & UPA chairperson Sonia Gandhi in Raipur, Chhattisgarh pic.twitter.com/ad4JQ3cFrd — ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) February 25, 2023

मोदी सरकारकडून काही उद्योगपतींना झुकतं माप
काँग्रेस आणि देशासाठी ही खूप आव्हानात्मक वेळ आहे. देशातील प्रत्येक संस्थेवर भाजप- आरएसएसने आक्रमण केलं आहे. काही मोजक्या उद्योगपतींना झुकतं माप दिल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला आहे. सध्या अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात असल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या. अदानी उद्योग समूहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं आहे. त्यावरून त्यांनी मोदी सरकारवर केलेली ही टीका आहे.

भारत जोडो यात्रेचं कौतुक
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची सोनिया यांनी यावेळी स्तुती केली. त्या म्हणाल्या की, राहुल यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेने चांगलं काम केलं आहे. ज्या प्रकारे राहुल यांनी या यात्रेमध्ये लोकांच्या जवळ जात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ते वाखाणण्याजोगं आहे.

प्रियंका गांधींचं जंगी स्वागत
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी साधारण 11 वाजता महाअधिवेशनाची औपचारिक सुरुवात वंदे मातरम गीताने झाली. महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी प्रियंका गांधी सकाळी 9 वाजता रायपूरला आल्या. त्यांचं यावेळी भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी भव्य रोड शो करण्यात आला. प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस समर्थकांनी रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षावही करण्यात आला.

Web Title: Sonia gandhi speech in raipur congress convention nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2023 | 01:08 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Marathi News
  • sonia gandhi news

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
2

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
4

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.