
ssskid-3-new
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात (Odisha train accident) 250 हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे तर सुमारे एक हजार लोक जखमी झाले आहेत. तीन गाड्यांच्या या भीषण धडकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्यामध्ये अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला आहे. या तपास अहवालात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड उघड झाला आहे.
[read_also content=”रेल्वेरुळ झाले वेगळे, चाकं निघाली; गॅस कटरने बोगी कापून बाहेर काढले जात आहेत मृतदेह https://www.navarashtra.com/india/odisha-train-accident-death-toll-rises-to-233-900-people-are-serious-railway-minister-ashwini-vaishnav-presented-nrps-409143.html”]
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताबाबत (Odisha train accident) संयुक्त तपास अहवाल समोर आला आहे. या अहवालात सिग्नलमधील बिघाड हे अपघाताचे कारण सांगितले जात आहे. या अहवालानुसार, मालगाडी लूप लाइनवर उभी होती, सिग्नल समस्येमुळे कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, मालगाडी बहनगा बाजार स्टेशनवर लूप लाइनमध्ये उभी होती. दरम्यान, चेन्नईहून हावडाकडे जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकावर पोहोचली. दुसरी ट्रेन पास करण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर लूप लाइन आहे. बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. जेव्हा एखादी ट्रेन स्टेशनवरून पास करावी लागते तेव्हा कोणतीही ट्रेन लूप लाइनवर उभी केली जाते. बहनगा बाजार स्थानकावर कोरोमंडल एक्स्प्रेस आणि यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस पास करण्यासाठी, मालगाडी सामान्य लूप लाइनवर उभी करण्यात आली. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य अप मार्गावरून भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसही डाऊन मार्गावरून जात होती.
बहनगा बाजार स्थानकावर या गाड्यांना थांबा नाही. अशा स्थितीत दोन्ही गाड्यांचा वेग वेगवान होता. बहनगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरली. रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्सप्रेसचे काही डबे मालगाडीला धडकले. अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसच्या मागचे दोन डबे रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसलाही धडकले.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सांगितले की, ओडिशातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50-50 हजार रुपये दिले जातील. रेल्वेमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10-10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2-2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50-50 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
रेल्वे अपघातातील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत 280 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.