Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीडितांना अतिरिक्त नुकसान भरपाई मिळणार नाही! सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली केंद्राची यचिका

सर्वोच्च न्यायालयाने 2010 मध्ये दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर जानेवारीमध्ये सुनावणी पूर्ण केली होती. या खटल्याचा निकाल राखून ठेवण्यात आला असून मंगळवारी निकाल सुनावण्यात आला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 14, 2023 | 12:26 PM
पीडितांना अतिरिक्त नुकसान भरपाई मिळणार नाही! सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली केंद्राची यचिका
Follow Us
Close
Follow Us:

भोपाळ : बहुचर्चित भोपाळ गॅस दुर्घटनेतल्या (Bhopal Gas Tragedy) पीडितांना भरपाईची रक्कम वाढवून मिळावी, अशी याचिका केंद्राकडून दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. 7400 कोटी रुपयांची अतिरिक्त भरपाई मिळावी यासाठी केंद्राने ही याचिका दाखल केली होती.

[read_also content=”पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना २४ तासांत होऊ शकते अटक! इस्लामाबाद पोलिस कधीही पोहचु शकते लाहोरमध्ये https://www.navarashtra.com/world/former-prime-minister-of-pakistan-imran-khan-can-be-arrested-within-24-hours-nrps-375947.html”]

अतिरिक्त नुकसान भरपाईची होती मागणी 

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची उपचारात्मक याचिका फेटाळली आहे, ज्यामध्ये केंद्राने भोपाळ वायू दुर्घटनेबाबत डाऊ केमिकल्सकडून अतिरिक्त नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यामुळे गॅसग्रस्तांसोबतच केंद्र व राज्य सरकारलाही मोठा फटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2010 मध्ये दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर जानेवारीमध्ये सुनावणी पूर्ण केली होती. या खटल्याचा निकाल राखून ठेवण्यात आला असून मंगळवारी निकाल सुनावण्यात आला.

केंद्र सरकारने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, 1989 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नुकसान भरपाई निश्चित करताना 2.05 लाख पीडितांना गृहीत धरले होते. या वर्षांत गॅसबाधितांची संख्या अडीच पटीने वाढून 5.74 लाखांहून अधिक झाली आहे. अशा परिस्थितीत नुकसानही वाढले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने नुकसान भरपाई वाढवण्याचे मान्य केले असते तर भोपाळच्या लाखो गॅस पीडितांनाही त्याचा फायदा झाला असता. मात्र, न्यायालयाने हे युक्तिवाद फेटाळून लावले आणि युनियन कार्बाइडची मूळ कंपनी डाऊ केमिकल्सशी १९८९ मध्ये झालेला एकेकाळचा करार पुन्हा उघडता येणार नाही, असे स्पष्ट केले.

नेमकं काय घडलं होतं?

 2-3 डिसेंबरच्या रात्री भोपाळमधील युनियन कार्बाइड (आता डाऊ केमिकल्स) च्या कारखान्यातून मिथाइल आयसोसायनेट (MIC) वायूची गळती झाली. यामुळे शेकडो मृत्यू झाले. अपघातानंतर एकोणतीस वर्षांनंतर, न्यायमूर्ती एस के कौल यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने १९८९ मध्ये निश्चित केलेल्या ७२५ कोटी रुपयांव्यतिरिक्त ६७५.९६ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या याचिकेवर निर्णय राखून ठेवला होता. ही याचिका केंद्र सरकारने डिसेंबर 2010 मध्ये दाखल केली होती आणि आता तब्बल 13 वर्षांनंतर निर्णय आला आहे. मात्र, डाऊ केमिकल्सने याआधीच सर्वोच्च न्यायालयात एक रुपयाही अधिक देण्यास तयार नसल्याचे स्पष्ट केले होते. अतिरिक्त भरपाई मागण्याचा हा आधार होता 4 मे 1989 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की युनियन कार्बाइडला गॅस दुर्घटनेसाठी $470 दशलक्ष किंवा त्यावेळी 725 कोटी रुपये द्यावे लागतील. या दुर्घटनेत 3,000 लोक मरण पावले आणि दोन लाखांहून अधिक लोक बाधित झाले. तथापि, 15 डिसेंबर 2022 च्या कल्याण आयुक्तांच्या अहवालानुसार, भोपाळ गॅस दुर्घटनेमुळे आतापर्यंत 5,479 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1989 मध्ये, 20,000 लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले, तर 50,000 लोकांना किरकोळ दुखापत झाली, या आधारावर भरपाई देण्यात आली. मात्र, हा आकडा वाढून अनुक्रमे ३५ हजार आणि ५.२७ लाख झाला. म्हणजेच 4 मे 1989 रोजी एकूण बळी 2.05 लाख होते, ते 5.74 लाख झाले आहेत. युनियन कार्बाइडने विरोध केला आहे युनियन कार्बाइड हे डाऊ केमिकल्सने विकत घेतले असून वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. सेटलमेंटमध्ये केस पुन्हा सुरू करण्याची तरतूद नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. युनियन कार्बाइडच्या घटनेबाबत अद्यापपर्यंत जबाबदारी निश्चित केलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर भरपाईचा अतिरिक्त बोजा लादता येणार नाही.

Web Title: The supreme court rejected the petition seeking to increase the amount of compensation to the victims nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2023 | 12:19 PM

Topics:  

  • bhopal
  • Supreme Court

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.