Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एनडीएमधील सहभागावरून नितीशकुमारांचं मोठं विधान; म्हणाले, ‘आम्ही दोनदा…’

आधी हिंदू-मुस्लीम यांच्यातील वादाच्या बातम्या येत होत्या. मात्र, जेव्हापासून बिहारच्या जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली, तेव्हापासून बिहारची परिस्थिती बदलली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 06, 2025 | 08:46 AM
बिहार निवडणुकीआधी नितीश कुमारांची मोठी खेळी; उच्चवर्णीयांच्या विकासासाठी आयोगाची स्थापना

बिहार निवडणुकीआधी नितीश कुमारांची मोठी खेळी; उच्चवर्णीयांच्या विकासासाठी आयोगाची स्थापना

Follow Us
Close
Follow Us:

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावरून जोरदार चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आता यावर नितीशकुमार यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, ‘आम्ही दोनदा चुकून इकडेतिकडे गेलो होतो. आता नेहमीच सोबत राहू आणि बिहारसोबतच देशाचा विकास करू’. असे म्हणत नितीशकुमार यांनी राजकीय वर्तुळातील उलटसुलट चर्चांना एकप्रकारे पूर्णविरामच दिला.

प्रगती यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी गोपालगंजमध्ये पोहचलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमारांनी त्यांच्या पुन्हा रालोआला सोडचिठ्ठी देणार असल्याबाबतच्या सुरू चर्चावर मौन सोडले. नितीश कुमार म्हणाले, आधी हिंदू-मुस्लीम यांच्यातील वादाच्या बातम्या येत होत्या. मात्र, जेव्हापासून बिहारच्या जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली, तेव्हापासून बिहारची परिस्थिती बदलली आहे. प्रत्येक क्षेत्रात विकासाचे काम सुरू आहे. कोणासोबतही भेदभाव केला जात नाही. आम्ही मिळून बिहारला पुढे नेत आहोत.

दरम्यान, बिहारचा कोणताही भाग विकासापासून दूर नाही. आम्ही शिक्षण, आरोग्य, रस्ते, पूल निर्माणाचे मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ज्यामुळे बिहारमधील कोणत्याही कोपऱ्यातून लोक पाटणाला सहा तासांत पोहचत होता. आता हा कालावधी कमी होवून पाच तासांवर आला आहे. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नितीशकुमारांच्या पाठिंब्याने केंद्रात मोदींचे सरकार

नितीशकुमारांच्या पाठिंब्याने केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आहे. आठवडा-दहा दिवसांपूर्वी अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीलाही नितीश कुमार यांनी उपस्थित राहणे टाळले, तर एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार यांच्यासारखीच भूमिका बजावणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित होते.

भाजप जदयूचे 10 खासदार फोडतंय : संजय राऊत

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी  नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड भाजपासोबतची युती तोडेल. नितीशकुमारांच्या दहा खासदारांना भाजप आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा त्यांनी केला. बिहारमध्ये भाजप आपल्या मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. भाजप बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत युती करीत आहे, पण आता ते जेडीयूच्या १० खासदारांना आपल्या गोटात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: We are with nda says nitish kumar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • Indian Political News

संबंधित बातम्या

भाजपला दक्षिणेत धक्का, या पक्षाने सोडली  NDA ची साथ, राजकीय समीकरणं बदलणार
1

भाजपला दक्षिणेत धक्का, या पक्षाने सोडली NDA ची साथ, राजकीय समीकरणं बदलणार

‘पाकिस्तान तर भारताची पत्नी झाली…’ ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेत राडा, हनुमान बेनीवालचे विधान; म्हणाले ‘भारतात दहशतवाद…’
2

‘पाकिस्तान तर भारताची पत्नी झाली…’ ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेत राडा, हनुमान बेनीवालचे विधान; म्हणाले ‘भारतात दहशतवाद…’

‘पाणी आणि रक्त एकत्र नाही, पण क्रिकेट मात्र…’ ऑपरेशन सिंदूरबाबत Owaise चा मोदी सरकारला सवाल
3

‘पाणी आणि रक्त एकत्र नाही, पण क्रिकेट मात्र…’ ऑपरेशन सिंदूरबाबत Owaise चा मोदी सरकारला सवाल

RSS बद्दल काँग्रेस पुन्हा बरळला; “केंद्रात सत्तेत आल्यास कायदेशीर प्रक्रिया करत….; प्रियंक खर्गेंच्या विधानाने नवा वाद
4

RSS बद्दल काँग्रेस पुन्हा बरळला; “केंद्रात सत्तेत आल्यास कायदेशीर प्रक्रिया करत….; प्रियंक खर्गेंच्या विधानाने नवा वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.