Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इतिहास घडवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील’; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मी 1.4 अब्ज भारतीयांना अभिनंदन करतो. स्वातंत्र्यानंतर, सरदार पटेल यांनी 550 हून अधिक संस्थानांना भारतीय संघराज्यात एकत्रित करण्याचे अशक्य वाटणारे काम पूर्ण केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 31, 2025 | 01:05 PM
'इतिहास घडवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील'; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

'इतिहास घडवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील'; पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, “सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मी 1.4 अब्ज भारतीयांना अभिनंदन करतो. स्वातंत्र्यानंतर, सरदार पटेल यांनी 550 हून अधिक संस्थानांना भारतीय संघराज्यात एकत्रित करण्याचे अशक्य वाटणारे काम पूर्ण केले. अशाप्रकारे इतिहास घडवण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील”, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडमध्ये पंतप्रधान मोदी यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, “आज लाखो लोकांनी एकतेची प्रतिज्ञा घेतली. देशाची एकता मजबूत करणाऱ्या कृतींना प्रोत्साहन देण्याचा आपण संकल्प केला आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाची एकता कमकुवत करणारा कोणताही विचार किंवा कृती सोडून दिली पाहिजे. आपल्या देशासाठी ही काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे आपण, १.४ अब्ज देशवासी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो, त्याचप्रमाणे एकता दिनाचे महत्त्व आपल्यासाठी प्रेरणा आणि अभिमानाचा क्षण आहे”, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : Indira Gandhi: एकीकडे शोक तर दुसरीकडे आनंद; महापुरुषांच्या जयंती अन् पुण्यतिथीचे देशात भिन्न चित्र

तसेच एकता नगरमध्ये, एकता मॉल आणि एकता गार्डनमध्ये एकतेचा धागा मजबूत करताना दिसतात. देशभरात सुरू असलेल्या रन फॉर युनिटी, लाखो भारतीयांचा उत्साह, आपण एका नवीन भारताचा संकल्प पाहत आहोत, असे

इतिहास घडवण्यासाठी घेतले पाहिजेत कठोर परिश्रम 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘काल संध्याकाळी झालेल्या अद्भुत सादरीकरणासह येथे घडलेल्या घटना भूतकाळातील परंपरा, वर्तमानातील कठोर परिश्रम आणि शौर्य आणि भविष्यातील कामगिरीची झलक दर्शवतात. सरदार पटेलांचा असा विश्वास होता की, इतिहास लिहिण्यात वेळ वाया घालवू नये; आपण इतिहास घडवण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. त्यांच्या चरित्रात ही भावना प्रतिबिंबित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी घेतलेल्या धोरणांनी आणि निर्णयांनी नवा इतिहास घडवला’.

हेदेखील वाचा : Indira Gandhi Death Anniversary: अंगरक्षकानेच केली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या; जाणून घ्या 31 ऑक्टोबरचा इतिहास

Web Title: We will have to work hard to make history pm narendra modis appeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • political news

संबंधित बातम्या

महायुती न झाल्यासही निवडणूक लढवणारच; शिवसेनेच्या ‘या’ पदाधिकाऱ्याचा निर्धार
1

महायुती न झाल्यासही निवडणूक लढवणारच; शिवसेनेच्या ‘या’ पदाधिकाऱ्याचा निर्धार

Rahul Gandhi News: इंदिरा गांधींमध्ये नरेंद्र मोदींपेक्षा जास्त हिंमत होती…; राहुल गांधींनी मोदींना पुन्हा डिवचले
2

Rahul Gandhi News: इंदिरा गांधींमध्ये नरेंद्र मोदींपेक्षा जास्त हिंमत होती…; राहुल गांधींनी मोदींना पुन्हा डिवचले

BMC Election : जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘इतक्या’ जागांचा आग्रह…
3

BMC Election : जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘इतक्या’ जागांचा आग्रह…

बिहारमध्ये पीके चालणार किती? तिरपी चाल खेळून ठरणार राजकीय बुद्धीबळातील घोडा?
4

बिहारमध्ये पीके चालणार किती? तिरपी चाल खेळून ठरणार राजकीय बुद्धीबळातील घोडा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.