Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीसीसीआय या 3 फलंदाजांना सलामीवीर बनवू शकते! हे तिघही हिटमॅनपेक्षा आहेत घातक

रोहित शर्मा सध्या ३४ वर्षांचा असून तो ३-४ वर्षांपेक्षा जास्त खेळू शकणार नाही. टीम इंडियामध्ये काही मजबूत खेळाडू आहेत. जे 'हिटमॅन' रोहित शर्मापेक्षाही धोकादायक आहेत आणि लवकरच टीम इंडियाचा पुढचा सलामीवीर बनू शकतात.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 09, 2022 | 02:19 PM
बीसीसीआय या 3 फलंदाजांना सलामीवीर बनवू शकते! हे तिघही हिटमॅनपेक्षा आहेत घातक
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक लवकरच होणार आहे. विश्वचषकासाठी टीम इंडियाला आतापासून तयारी करावी लागणार आहे. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक भारतात आहे, त्यासाठी टीम इंडिया पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. टीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे येत्या ३ ते ४ वर्षांत ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या अडचणी वाढू शकतात. रोहित शर्मा सध्या ३४ वर्षांचा असून तो ३-४ वर्षांपेक्षा जास्त खेळू शकणार नाही. टीम इंडियामध्ये असे काही मजबूत खेळाडू आहेत, जे ‘हिटमॅन’ रोहित शर्मापेक्षाही धोकादायक आहेत आणि लवकरच टीम इंडियाचा पुढचा सलामीवीर बनू शकतात.

जाणून घेवूया, ते तीन खेळाडू कोण आहेत?

१. ऋषभ पंत

ज्याप्रमाणे रोहित शर्माला मधल्या फळीतून सलामीवीर बनवण्यात आले, त्याचप्रमाणे ऋषभ पंतलाही टीम इंडियाचा सलामीवीर बनवले जाऊ शकते. टीम इंडियासाठी सर्वात मोठा फायदा हा असेल की ऋषभ पंत हा डावखुरा फलंदाज आहे, जो सलामीला कोणत्याही विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. ऋषभ पंत टीम इंडियाचा सलामीवीर बनला तर तो या ठिकाणी दीर्घकाळ वादळ निर्माण करू शकतो.

ऋषभ पंतही कर्णधारपदात माहिर आहे. येत्या काही दिवसांत तो सलामीसोबतच कर्णधारपदातही रोहित शर्माशी स्पर्धा करेल. ऋषभ पंतकडेही धोनीइतकीच ताकद आहे.  २००७ मध्ये जेव्हा धोनीला टीम इंडियाचे कर्णधारपद देण्यात आले होते, तेव्हा त्याची खेळीही चांगली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मैदानावरील कोणत्याही खेळाडूपेक्षा यष्टीरक्षकाला खेळ जास्त कळतो, त्यामुळे पंतचा वापर धोनीप्रमाणे होऊ शकतो, हे सर्वांना माहीत आहे.

२. ईशान किशन

टीम इंडियाचा युवा खेळाडू इशान किशन फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणातही तरबेज आहे. आयपीएल २०२१ मध्ये, मुंबईला आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हैदराबादविरुद्ध मोठा विजय आवश्यक होता, ज्यामध्ये इशान किशनने ३२ चेंडूत ८४ धावा केल्या. इशान किशनच्या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता.

ईशान किशनची ही धमाकेदार खेळी पाहून सगळेच थक्क झाले. मुंबई आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही. पण, इशान किशनने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने प्रेक्षकांची मनं जिंकली. इशान किशन येत्या काही दिवसांत रोहित शर्माची जागा घेऊ शकतो आणि एकहातीपणे सामन्याचे चित्र बदलू शकतो.

३. पृथ्वी शॉ

दमदार फलंदाज पृथ्वी शॉ स्फोटक फलंदाजीत माहिर आहे. भारतीय क्रिकेट संघात सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ हा प्रबळ दावेदार मानला जातो, जो रोहित शर्माची जागा भरून काढू शकतो. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉला अनेकदा टीम इंडियात संधी मिळाली आहे. त्याने आपल्या जलद फलंदाजीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पृथ्वी शॉ हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा जोडीदार मानला जातो, ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त फटके आहेत. आगामी काळात पृथ्वी शॉ ‘हिटमॅन’ रोहित शर्माची पानं कापून टीम इंडियाचा कायमस्वरूपी सलामीवीर होऊ शकतो. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने १९ वर्षांखालील विजेतेपदही पटकावले आहे. २०१९ अंडर-१९ विश्वचषक फायनलमध्ये भारताच्या युवा स्टार्सनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तेव्हा शॉ त्या संघाचा कर्णधार होता. शुबमन गिल आणि शिवम मावी सारखे स्टार्सही त्यावेळी याच टीमचा भाग होते.

Web Title: Bcci wants to make these 3 deadly batsmen openers all three are more dangerous than rohit sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2022 | 02:19 PM

Topics:  

  • indian cricket team
  • Ishan Kishan
  • playing 11
  • Rishabh Pant
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND vs USA : नाणेफेक सोडून कर्णधार सूर्या अचानक गेला कुठे? हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने होत आहे Viral
1

IND vs USA : नाणेफेक सोडून कर्णधार सूर्या अचानक गेला कुठे? हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने होत आहे Viral

IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…
2

IND vs USA : सुंदर-बुमराहच्या फिटनेसबद्दल सूर्यकुमार यादवने दिली मोठी अपडेट, विजयानंतरही कर्णधार खूश नाही…

IND vs USA : विजयी सुरुवात आणि विश्वविक्रम… टीम इंडियाने यूएसला पराभूत करुन रचला इतिहास!
3

IND vs USA : विजयी सुरुवात आणि विश्वविक्रम… टीम इंडियाने यूएसला पराभूत करुन रचला इतिहास!

IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्यावर बाॅयकाॅट करण्याच्या निर्णयावर पाकिस्तान यू-टर्न घेणार, पीसीबी करणार सरकारशी चर्चा
4

IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्यावर बाॅयकाॅट करण्याच्या निर्णयावर पाकिस्तान यू-टर्न घेणार, पीसीबी करणार सरकारशी चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.