Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरकुलाचा चेक देण्यासाठी मागितली ५ हजार रुपयांची लाच; एसीबीकडून तिघांना अटक

आर्थिक दुर्लभ आणि मागासवर्गीय समाजातील (economically deprived and backward communities) नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून सरकारने विविध घरकुल योजना (housing schemes) सुरू केल्या आहेत . मात्र, घरकुलाच्या बांधकामासाठी तिसऱ्या हप्त्याचा चेक काढण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 23, 2021 | 06:53 PM
घरकुलाचा चेक देण्यासाठी मागितली ५ हजार रुपयांची लाच; एसीबीकडून तिघांना अटक
Follow Us
Close
Follow Us:

अकोला (Akola). आर्थिक दुर्लभ आणि मागासवर्गीय समाजातील (economically deprived and backward communities) नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून सरकारने विविध घरकुल योजना (housing schemes) सुरू केल्या आहेत . मात्र, घरकुलाच्या बांधकामासाठी तिसऱ्या हप्त्याचा चेक काढण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती अडीच हजार रुपये स्वीकारणाऱ्या खडकी टाकळी उपसरपंचासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे.

[read_also content=”चंद्रपूर/ ३ वाघ गावात शिरले; हुसकावून लावताना तीन ग्रामस्थांवर वाघांचा हल्ला https://www.navarashtra.com/latest-news/3-tigers-entered-the-village-tigers-attack-three-villagers-while-evicting-them-nrat-146353.html”]

दिलीप दौलत सदांशिव, अमित युवराज शिरसाट, सुधीर मनतकार व योगेश अरुण शिरसाट अशी लाचखोर आरोपींची नावे आहेत. व्यवसायाने शेतमजूर असलेल्या तक्रारदार यांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचे जिओ टॅगिंग करून तिसऱ्या हप्त्याचा चेक काढण्यासाठी तक्रारदारास अमित युवराज शिरसाट याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेवटी तडजोडीअंती त्याने अडीच हजार रुपये लाच स्वीकारली. तसेच अन्य आरोपींनी त्यास समर्थन दिले.

व्यवसायाने शेतमजूर असणाऱ्या खडकी टाकळी येथील 42 वर्षीय व्यक्तीने घरकुल मंजूर झाल्यानंतर बांधकामही सुरू केले असून घराचे जिओ टॅगिंग करून तिसरा हप्ताचा धनादेश देण्याची विनंती या शेतमजुरांनी खडकी टाकळी येथील उपसरपंच दिलीप दौलत सदाशिव (५२), आगर येथील ग्रामीण गृह निर्माण अभियंता अमित सिरसाट (२६), अकोला पंचायत विभागातील लिपिक सुधीर मनातकार (३५) आणि अमाणतपुर येथील रोजगार सेवक योगेश सिरसाट (२९) त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे पाच हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष 21 जून रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्नही झाले. त्यानंतर आगर येथील कंत्राटी अभियंता यांच्या निवासस्थानी दोन हजार पाचशे रुपयांची लाच घेताना यामधील उपसरपंच दिलीप सदाशिव कंत्राटी अभियंता अमित शिरसाट व रोजगार सेवक योगेश शिरसाट या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

तर सुधीर मनतकार याचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शरद मेमाने, अन्वर खान, संतोष दहीहंडे आदींनी केली आहे.

Web Title: Bribe of rs 5000 demanded for giving cheque three arrested by acb nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2021 | 06:53 PM

Topics:  

  • Gharkul Yojana

संबंधित बातम्या

Gharkul Scheme : राज्यात ३४ लाख कुटुंबांनाकडे पक्की घरे नाहीत; १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बेघर कुटुंबे
1

Gharkul Scheme : राज्यात ३४ लाख कुटुंबांनाकडे पक्की घरे नाहीत; १३ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बेघर कुटुंबे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.