अहमदाबाद : दारुबंदी (Prohibition Of Alcohol) असलेल्या गुजरात राज्यात विषारी दारुमुळे (Poisonous Liquor) २५ जणांचा मृत्यू झाला आहे. बोटाद (Botat) शहरातही ही घटना घडली असून या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारने (Government Of Gujarat) एसआयटीची स्थापना (SIT Inquiry) केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात गावठी दारु बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या १३ जणांसह मिथेनॉल (Methanol) पुरवणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
दारुची बंदी असलेल्या गुजरात राज्यात धक्कादायक घटना घडली आहे. विषारी दारु पिल्यामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे. बोटाद याठिकाणी ही घटना घडली आहे. मृत व्यक्तिंना देशी दारु दिल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, ही देशी दारु नसून केमिकल होते.
Gujarat | Four people dead after drinking spurious liquor in Dhandhuka, six people have been shifted to Ahmedabad for further treatment: Dr Sanket, Medical Officer Dhandhuka pic.twitter.com/8I6wt2FNYI
— ANI (@ANI) July 25, 2022
हे केमिकल एका कंपनीतून चोरुन आणल्याची माहिती देखील मिळत आहे. देशी दारु म्हणून हे केमिकल लोकांना देण्यात आले. यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. चोरी केलेले केमिकल दारु म्हणून विकले गेले, त्यामुळेच ही दुर्घटना झाली असल्याची माहिती मिळत आहे.