rajnath singh
सध्याच्या तणावामुळे युक्रेन आणि रशियाच्या (Russia And Ukraine War) अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला तर त्याची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागेल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी शुक्रवारी सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या अगोदर उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) चंदौली येथे जाहीर सभेला संबोधित करताना सिंह म्हणाले की, बहुतेक देश रशियाकडून तेल आणि वायू आयात करतात. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे.
#WATCH If war b/w Russia&Ukraine continues it’ll cause more trouble. Most nations import oil, gas from Russia…US has imposed sanctions on Russia…If their economies are affected, entire world has to pay price& India will not be spared:Defence Min Rajnath Singh in Chandauli, UP pic.twitter.com/dDxRtCIyKp
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 4, 2022
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू राहिल्यास आणखी त्रास होईल, असे राजथान सिंह म्हणाले. जगातील बहुतेक देश रशियाकडून तेल आणि वायू आयात करतात. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. ते पुढे म्हणाले की, जर त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तर त्याची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागेल आणि भारत यातून सुटणार नाही.
भाजपा कधीही जनतेच्या विश्वासाला तोडत नाही आणि दिलेली आश्वासने पूर्ण करतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. जौनपूरच्या मल्हानी आणि चंदौलीच्या चकिया विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणूक प्रचारसभांना संबोधित करताना सिंह यांनी दावा केला की, गेल्या ३५-४० वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये एकाही पक्षाने सलग दोन वेळा सरकार स्थापन केले नाही, पण भाजपा सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.
[read_also content=”रवींद्र जडेजाचे दुसरे शतक, अश्विन ६१ धावांवर बाद; दुपारच्या जेवणापर्यंत ४६८/७ स्कोअर https://www.navarashtra.com/article/india-v-sri-lanka-mohali-test-live-ravindra-jadejas-second-century-ashwin-dismissed-for-61-468-7-score-till-lunch-249484/”]
यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युक्रेनमधील विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या ऑपरेशन गंगाबद्दल ही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, माध्यमांना संबोधित करताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की एकूण ४८ उड्डाणे चालविली गेली आहेत आणि १०,३४८ विद्यार्थ्यांना परत आणले आहे. गेल्या २४ तासात १८ उड्डाणे चालवण्यात आल्याची माहिती बागची यांनी दिली. “पिसोचिनमध्ये ९०० ते १००० भारतीय आणि सुमीमध्ये ७०० हून अधिक विद्यार्थी अडकून पडले आहेत. आम्ही तेथे काही बसेस पाठवण्यात यशस्वी झालो आहोत. पाच बस आधीच सुरू आहेत, आणि संध्याकाळी उशिरा आणखी बस चालवल्या जातील. आम्ही अधिकाऱ्यांना विशेष विनंती केली होती. युद्धविरामशिवाय विद्यार्थ्यांना बाहेर काढणे कठीण दिसत आहे. आम्ही युक्रेन आणि रशियाला युद्धविराम करण्याची विनंती करतो जेणेकरून आम्ही स्थलांतर करू शकू,” असे बागची म्हणाले.