Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यपालांनी आपले कर्तव्य पार पाडावे

महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव गेल्या 8 महिन्यांपासून राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. राज्यपालांनी अजूनही या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Jul 21, 2021 | 01:00 PM
राज्यपालांनी आपले कर्तव्य पार पाडावे
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र सरकारने १२ सदस्यांची नावे राज्यपालांकडे पाठविलेली आहेत. राज्यपालांनी सरकारच्या या प्रस्तावाला मंजुरी देणे, ही खरं म्हणजे औपचारिकता असते. राज्यपालांनी या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यायला हवी होती, परंतु या प्रस्तावाला मंजुरीही दिली नाही किंवा या प्रस्तावात काही तृटी आहेत का, असेही सरकारला कळवले नाही. कोणतेही कारण न देता हा प्रस्ताव राज्यपालांकडे मंजुरीवीना प्रलंबीत आहे. केंद सरकारच्या इशाऱ्यावरन राज्यपालांनी अजूनपर्यंत 12 सदस्यांचा विधानपरिषदेवर नियुक्तीचा प्रस्ताव रोखून ठेवला आहे का? या 12 सदस्यांच्या नावांना मंजुरी दिली तर महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे संख्याबळ आणखी वाढणार आहे व तेच क्रेंद्र सरकारला नको आहे. यामुळे राज्यसरकार आणि राज्यपालांमध्ये तणावाची परिस्थिती निर्णाम होऊ शकते. महाराष्ट्रातील सत्तारुढ महविकास आघाडी सरकारने राज्यपालांच्या या भूमिकेवर अनेकदा प्रन्हचिन्ह निर्माण केले आहे. 12 एमएलसीच्या नियुक्तीला राज्यपालांकडून जो विलंब होत आहे, त्यानुषंगाने नाशिक येथील रतन सोली लूथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या संदर्भात विचारणा केली असता राज्य सरकारने सदस्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात पाठविलेल्या प्रस्तावाला उत्तर देण्यास राज्यपाल बांधील नाही, असा दावा केंद्राने केला आहे. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुळकर्णी यांच्या पीठाने सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर यावरील निर्णय राखून ठेवला आहे. राज्यपालांनी या नियुक्त्या थांबवून ठेवल्या असेल तर शेवटी कोणता उपाय आहे? असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. सदस्यांच्या नियुक्त्यांचा प्रस्ताव मंजूर करणे किंवा फेटाळून लावणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे. यापासून पळ काढता येणार नाही. राज्यपालांनी त्यांचे घटनात्मक कर्तव्य पार पाडावे. शेवटी हा प्रस्ताव आणखी किती काळ प्रलंबित राहणार आहे? लोकशाहीमध्ये राज्य सरकारलाही अधिकार असतात राज्यपालांकडून योग्य सहकार्याची अपेक्षा जर सरकार ठेवीत असेल तर त्यात काय चुकीचे आहे?

Web Title: Governors should do their duty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2021 | 01:00 PM

Topics:  

  • Governor Bhagatsing Koshyari
  • mahavikas aghadi government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.