Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेस्ट इंडिजचा सफाया, भारताने तिसऱ्या टी-२०मध्ये १७ धावांनी मात करून जिंकली मालिका

टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 17 धावांनी पराभव करत मालिका जिंकली. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी चमकदार कामगिरी केली.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 21, 2022 | 11:14 AM
वेस्ट इंडिजचा सफाया, भारताने तिसऱ्या टी-२०मध्ये १७ धावांनी मात करून जिंकली मालिका
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: टीम इंडियाने टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा १७ धावांनी पराभव करत मालिका ३-० अशी खिशात घातली. वनडेनंतर आता भारताने टी-२० मालिकेतही क्लीन स्वीप केला आहे. संघासाठी सूर्यकुमार यादवने  अर्धशतक झळकावले. तर व्यंकटेश अय्यरने अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. कोलकातामध्ये वेस्ट इंडिजकडून खेळल्या गेलेल्या या सामन्यात निकोलस पूरनने ६१ धावांची चांगली खेळी केली.

कर्णधार किरॉन पोलार्ड अवघ्या ५ धावा करून बाद झाला. त्याचवेळी जेसन होल्डर २ धावा करून बाद झाला. या दोन्ही खेळाडूंना व्यंकटेश अय्यरने बाद केले. रोस्टन चेस १२ आणि सलामीवीर शाई होप वैयक्तिक ८ धावांवर बाद झाले. मेयर्सलाही केवळ ६ धावा करता आल्या.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ गडी गमावून १८४ धावा केल्या. यादरम्यान सूर्यकुमार यादवने तुफानी खेळी केली. त्याने ३१ चेंडूत ६५ धावा केल्या. तर व्यंकटेश अय्यरने १९ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. व्यंकटेशने या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारही मारले. सलामीवीर इशान किशनने ३४ आणि श्रेयस अय्यरने २५ धावांचे योगदान दिले.

टीम इंडियाकडून शानदार गोलंदाजी करताना दीपक चहरने २ बळी घेतले. त्याने १.५ षटकात १५ धावा दिल्या. यादरम्यान तो जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. व्यंकटेश अय्यरने २.१ षटकात २३ धावा देत २ बळी घेतले. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या आवेश खानला एकही विकेट मिळाली नाही. तर हर्षल पटेलने ३ बळी घेतले. त्याने ४ षटकात २२ धावा दिल्या. शार्दुल ठाकूरने ४ षटकात ३३ धावा देत २ बळी घेतले.

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १६७ धावाच करू शकला. निकोलस पूरनने संघासाठी चांगली खेळी केली. त्याने ४७ चेंडूत ६१ धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकारही लगावला. तर रोव्हमन पॉवेलने १४ चेंडूत २५ धावा केल्या. त्याच्या खेळीत दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

Web Title: India beat west indies by 17 runs in the third t20 to win the series 3 0

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2022 | 11:14 AM

Topics:  

  • 3rd T20
  • cricket
  • Ishan Kishan
  • Nicholas Pooran
  • Sport News

संबंधित बातम्या

“वानखेडे स्टेडियममध्ये जल्लोषाची संधी देणार नाही…”, इंग्लंडच्या सॅम करनचा ‘पॅट कमिन्सच्या’ स्टाईलमध्ये भारताला इशारा
1

“वानखेडे स्टेडियममध्ये जल्लोषाची संधी देणार नाही…”, इंग्लंडच्या सॅम करनचा ‘पॅट कमिन्सच्या’ स्टाईलमध्ये भारताला इशारा

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?
2

IND VS ENG Weather Report : भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये पाऊस बनणार ‘विलेन’? मोठ्या सामन्यापूर्वी कसं असेल मुंबईत हवामान?

भारत, इंग्लंड की दक्षिण आफ्रिका! T20 World Cup 2026 चे विजेतेपद कोण जिंकेल? एका माजी दिग्गजाने केली भविष्यवाणी
3

भारत, इंग्लंड की दक्षिण आफ्रिका! T20 World Cup 2026 चे विजेतेपद कोण जिंकेल? एका माजी दिग्गजाने केली भविष्यवाणी

T20 World Cup 2026 मधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिज संघही भारतात अडकला, बोर्डाने जारी केले निवेदन
4

T20 World Cup 2026 मधून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिज संघही भारतात अडकला, बोर्डाने जारी केले निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.