Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी दिले आश्वासन; म्हणाले…

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वाेच्च किताब दिला गेला नाही. ताे देण्याचे काम हे बिगर काॅंग्रेसी सरकारनेच केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. परंतु, त्याला काॅंग्रेस विराेध करीत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडून संसदेत येऊ नये यासाठी काॅंग्रेसने प्रयत्न केले हाेते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 19, 2021 | 05:37 PM
पुणे दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी दिले आश्वासन; म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्याच्या विकासासाठी माेदी सरकार कटीबद्ध आहे. त्यासाठी काेणतीही कसर साेडली जाणार नाही, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी येथे दिले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले. तर काॅंग्रेसने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमानच केल्याची टीकाही त्यांनी केली.

महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात आलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि हिरवळीवरील नियाेजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी ते बाेलत हाेते. महापाैर मुरलीधर माेहाेळ, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमहापाैर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर आदी यावेळी उपस्थित हाेते.

शहा यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशाच्या उभारणीमधील याेगदानाची माहीती दिली. ते म्हणाले, ‘‘स्वराज्य आणि स्वधर्म हे दाेन शब्द उच्चारण्याची भीती वाटावी अशी परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याचा अग्नि त्यांच्यामध्ये किती धगधगत हाेता, त्यासाठी संपूर्ण जीवनाचे याेगदान दिल्याचे त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते. सैन्याचे अत्याधुनिकीकरण, नाैदलाची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पुढे सुरुच राहिले. आज ते पूर्ण झाले आहे.’’

…म्हणून आपली राज्यघटना सर्वश्रेष्ठ राज्यघटना

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घटना निर्मितीमधील याेगदानाविषयी शहा म्हणाले, ‘‘पूर्ण जीवनात त्यांना अवहेलना, अपमान सहन करावे लागले. परंतु त्याचा परिणाम त्यांनी घटनानिर्मिती करताना हाेऊ दिला नाही. दलित, आदिवासीबराेबरच देशातील प्रत्येक नागरिकाचे अधिकार हे अबाधित ठेवण्याचे काम त्यांनी केले. यामुळे आपल्या देशाची राज्यघटना ही देशातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे. परंतु आज त्यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या काॅंग्रेसने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जिंवत असताना आणि नंतरही त्यांचा अवमानच केला आहे.

डॉ. आंबेडकर निवडून येऊ नये म्हणून काँग्रेसचे प्रयत्न

काॅंग्रेसची सत्ता असताना, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वाेच्च किताब दिला गेला नाही. ताे देण्याचे काम हे बिगर काॅंग्रेसी सरकारनेच केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. परंतु, त्याला काॅंग्रेस विराेध करीत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडून संसदेत येऊ नये यासाठी काॅंग्रेसने प्रयत्न केले हाेते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेल्या राज्यघटनेवरच माेदी सरकार देश चालवित आहे.’’

पुण्यातून सर्वाधिक स्टार्ट अप

पुण्याच्या संदर्भात शहा म्हणाले, ‘‘पुण्याच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाला केंद्र सरकारने मदत केली. पुण्यातील मेट्राेच्या तीन काॅरिडाॅरचे काम माेदी सरकारच्या काळात सुरु झाले. स्मार्टसिटी याेजनेंतर्गत पुण्याला शंभर काेटी रुपये दिले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी एक हजार बसेस दिल्या. नदीसुधार याेजनेसाठी ११० काेटी रुपये दिले. स्टार्ट अप सर्वांत जास्त पुण्यातून आले हाेते. त्यापैकी स्टार्ट अप आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहेत. पुण्याच्या विकासाकरीता केंद्र सरकार कटीबद्ध असून, त्यामध्ये काेणतीही कसर साेडली जाणार नाही.

Web Title: Modi government is committed to the development of pune says amit shah in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2021 | 05:37 PM

Topics:  

  • Amit Shah
  • अमित शहा

संबंधित बातम्या

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात
1

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला
2

Amit Shah on Rahul Gandhi: जनतेला आवडणाऱ्या कामांना विरोध करता, मग मतं कुठून मिळणार? अमित शाह यांचा राहुल गांधींना सणसणीत टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.