
BJP Amit Shah visit to West Bengal ahead of assembly elections 2026
काँग्रेसने घुसखोरांना देशात स्थायिक होऊ दिले
अमित शहा पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने घुसखोरांना देशात स्थायिक होऊ दिले. घुसखोरांविरुद्ध कारवाई करणे हे मोदी सरकारचे प्राधान्य आहे. मोदी सरकारने ईशान्येकडील शांतता सुनिश्चित करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत, अतिरेकी संघटनांशी शांतता करार केले आहेत. घुसखोरांना हाकलून लावले जात आहे. शाह म्हणाले की, घुसखोरांना संपूर्ण देशातून हाकलून लावले जाईल.
VIDEO | Nagaon: Addressing a public rally, Union Home Minister Amit Shah (@AmitShah) says, “Congress treated infiltrators – who threatened the people, culture and identity of Assam – as its vote bank.”#AmitShah #Assam #Congress (Full VIDEO available on PTI Videos –… pic.twitter.com/n5FSa7mWeY — Press Trust of India (@PTI_News) December 29, 2025
काँग्रेसने घुसखोरांना आपली “व्होट बँक” बनवले.
अमित शाह यांनी आरोप केला की काँग्रेस पक्षाने आसाममध्ये घुसखोरांना वसवले, त्यांचा “व्होट बँक” म्हणून वापर केला आणि स्थानिक संस्कृतीशी छेडछाड केली. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारने आसाम चळवळीतील शहीदांचा कधीही आदर केला नाही. ईशान्येकडील शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक अतिरेकी संघटनांसोबत ऐतिहासिक शांतता करार केले आहेत. या करारांमधील ९२% अटी अंमलात आणल्या गेल्या आहेत. सुमारे १०,५०० अतिरेकी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.
अमित शाह यांनी मुख्यमंत्री सरमा यांचे केले कौतुक
गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे कौतुक केले आणि सांगितले की राज्यातील १,००,००० बिघाहून अधिक जमीन घुसखोरांपासून मुक्त करण्यात आली आहे. वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान असलेल्या बटद्रवा थानच्या २२७ कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन अमित शाह यांनी केले. ते म्हणाले की, पूर्वी घुसखोरांनी व्यापलेले हे ठिकाण आता मुक्त करण्यात आले आहे आणि एका भव्य आध्यात्मिक केंद्रात रूपांतरित झाले आहे. भविष्यात भाजपला पुन्हा संधी मिळाली तर केवळ आसामच नाही तर संपूर्ण देश घुसखोरीमुक्त केला जाईल, असेही शाह म्हणाले. भारतरत्न गोपीनाथ बोरदोलोई यांच्या प्रयत्नांमुळे आसाम आज भारताचा भाग आहे, असेही त्यांनी सांगितले.