Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना हाणून पाडायचा शरद पवारांचा डाव; रणजितसिंह यांची टीका

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2021 | 05:01 PM
कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना हाणून पाडायचा शरद पवारांचा डाव; रणजितसिंह यांची टीका
Follow Us
Close
Follow Us:

अकलुज : राज्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प व पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार अनुकूल आहेत. परंतु राज्य सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधामुळे व केंद्राच्या प्रकल्पाला मदत न करण्याच्या भूमिकेमुळे दोन्ही प्रकल्प प्रलंबित असल्याचे स्पष्टीकरण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

अकलूज माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायती ते रूपांतर करण्याच्या मागणीसाठी 22 जूनपासून तीनही गावचे नागरिक साखळी उपोषण करत आहेत. आज उपोषणाच्या 25 व्या दिवशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन उपोषण करत यांची चर्चा केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

रणजितसिंह म्हणाले, अकलूजच्या उपोषणाचा 25 वा दिवस उजाडला तरी दखल घेतली जात नाही. हे दुर्दैवी आहे. मी या प्रकरणात लक्ष घालून याबाबतची तांत्रिक माहिती घेऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहे. हे केंद्र सरकार जागरूक असल्याने याची दखल घेऊन नक्की न्याय करेल याची मला खात्री आहे. पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गाविषयी खासदार निंबाळकर म्हणाले, या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याचा अहवाल आल्यानंतर यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. प्रस्तावित असलेल्या मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण देतानाच त्यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना हाणून पाडण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचा आरोप केला.

…म्हणून हा विषय प्रलंबित

केंद्र सरकारची निधी द्यायची तयारी आहे. परंतु आपला वाटा देण्यास राज्य सरकार तयार नाही. यामुळेच हा विषय प्रलंबित राहत असल्याचे खासदार नाईक निंबाळकर यांनी सांगितले. आजच्या उपोषणात उपसरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सातारा जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे निवेदन दिले.

Web Title: Mp ranjeetsingh naik nimbalkar talked about krushna bhima sthirikaran nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2021 | 05:01 PM

Topics:  

  • Ranjeetsingh Naik Nimbalkar
  • केंद्र सरकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.