Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ते’ अडीच लाख विद्यार्थी गेले कुठे? शिक्षकांना सतावतोय प्रश्न

गतवर्षी नववीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे ( 10th exam) आवेदनपत्र भरलेच नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी (students) गेले कुठे, असा प्रश्न शिक्षकांना (the teachers) सतावतो आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 15, 2021 | 05:54 PM
‘ते’ अडीच लाख विद्यार्थी गेले कुठे? शिक्षकांना सतावतोय प्रश्न
Follow Us
Close
Follow Us:

नंदोरी (Nandori).  गतवर्षी नववीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे ( 10th exam) आवेदनपत्र भरलेच नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी (students) गेले कुठे, असा प्रश्न शिक्षकांना (the teachers) सतावतो आहे. गतवर्षापासून राज्यात कोरोनामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (schools and junior colleges) वर्षभर बंद ठेवून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. कोरोनामुळे बहुसंख्य पालकांना रोजगार, नोकरी गमवाव्या लागल्या.

[read_also content=”मुंबई/ रूग्णसंख्या-मृत्यूदर वेगाने कमी होत असताना आरोग्य विभागात लसीकरणाची लगबग! अद्यापही लशींचे प्रमाण नगण्य असल्याने चिंता! https://www.navarashtra.com/latest-news/vaccination-in-the-health-department-is-almost-at-a-time-when-the-patient-mortality-rate-is-declining-rapidly-anxiety-as-vaccine-levels-are-still-negligible-nrat-142695.html”]

त्यामुळे त्यांनी विविध ठिकाणी स्थलांतर करण्यास प्राधान्य दिले. यामुळे बहुसंख्य मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर‌ राहिले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण मोहीम राबविली. यात प्रामुख्याने ६ ते १४ वयोगटातील मुलांचा शोध घेतला. या सर्वेक्षणातून राज्यात सुमारे २५ हजार २०४ मुले प्रत्यक्षात शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.

कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे दहावीचा निकाल लावण्याची कार्यपद्धतीही शासनाने जाहीर केली आहे. हे करत असताना या विद्यार्थ्यांना इयत्ता नववीच्या विषय निहाय निकालातील पन्नास टक्के गुण दहावीच्या निकालाच्या मूल्यमापनात ग्राह्य धरण्यात येणार आहे. शाळांनी सरल प्रणालीवर विद्यार्थ्यांच्या निकालाची नोंदवलेली माहितीच अधिकृत धरण्यात येणार आहे. यादृष्टीने शिक्षण विभागाने राज्याच्या नववीच्या एकूण निकालाबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. मात्र, यातून अजबच माहिती समोर आली आहे.

राज्यात २०११ मध्ये एकाच दिवशी पटसंख्या पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यात राज्यात अनेक बोगस शाळा आढळल्या. यावर आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने सरल प्रणालीचा अंगीकार केला. सरल प्रणालीत शाळांनी दर्शविलेल्या विद्यार्थिसंख्येनुसार, शाळांना संचमान्यता मिळते. हे सर्व खरे असले तरी राज्यात दरवर्षी नववीपर्यंत विद्यार्थिसंख्या असलेले विद्यार्थी नेमके दहावीत कुठे जातात? नववीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी काही अपवाद वगळता ९७-९८ टक्के विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे आवेदनपत्र भरायलाच पाहिजे.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे आवेदनपत्र भरलेच नाही. हे यंदाचे ठिक आहे; परंतु दरवर्षी राज्यातील नववीतील उत्तीर्ण झालेले लाख-दोन लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेचे आवेदनपत्र भरत नाहीत. मग हे विद्यार्थी जातात तरी कुठे, यावर राज्याचे शिक्षण विभागाने विचार करण्याची गरज आहे.

१९ लाखांपैकी १६ लाख विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज
२०१९-२० मध्ये राज्यात नववीसाठी १९ लाख ३४ हजार ९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १८ लाख ३१ हजार ३४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर २४ हजार १०७ विद्यार्थी नापास झाले होते. दरम्यान, दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले. उर्वरित विद्यार्थ्यांनी अर्जच भरले नाहीत. मग हे अर्ज न भरलेली मुले कोणत्या ना कोणत्या कारणाने शाळेच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Shocking two and a half lakh students did not fill up the form for the matriculation examination nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2021 | 05:54 PM

Topics:  

  • Department of Education

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.