Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक आदिवासी वाड्यांमधील पाण्याचा प्रश्न सुटेना; गावकरी त्रस्त

१२ आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना थेट घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळल्यासाठी निधी उपलब्ध पण ठेकेदारच पळून गेले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2024 | 04:07 PM
इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक आदिवासी वाड्यांमधील पाण्याचा प्रश्न सुटेना; गावकरी त्रस्त
Follow Us
Close
Follow Us:

इगतपुरी- इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथील १२ आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना थेट घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत गेल्या वर्षी १ कोटी ६६ लाख रुपये निधी मंजूर झाला. मात्र वर्ष उलटुनही या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट काही थांबण्याचे नाव घेत नाही. सरपंचांनी योजनेबद्दल माहिती विचारली तर येथील काम करणारे ठेकेदार येथील सरपंच यांना माहिती न देता दम देत असल्याची तक्रार येथील सरपंचांनी केली आहे.

वर्षभरापूर्वी ग्रामपंचायत हद्दीत जल जीवन मिशनच्या कामाची पूर्तता झाली. मात्र डोंगर माथ्यावर टाकी बांधून पाईप लाईन टाकून ठेकेदार गायब झाल्याचे दिसून आले. येथील वाड्यापाड्यातील घरात अजूनही नळ जोडणी केलेली नाही. त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या १२ वाड्यामधील आदिवासी महिला भगिनींना चक्क गढूळ पाण्याने तहान भागविण्याची वेळ आली आहे. याला कारणीभूत कोण संबंधित लोकप्रतिनिधी यांची उदासीनता की ठेकेदारांचा मनमानी कारभार दिसून येत आहे.

जर गावातील सरपंचालाच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत असेल तर साधारण नागरिकांचे काय असा प्रश्न लकी जाधव यांनी या प्रसंगी उपस्थित केला. इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत जवळपास शंभर करोड रुपयांची जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुरु असुन निम्याच्यावर या योजना अपुर्ण अवस्थेत असून ठेकेदारांना मात्र शंभर टक्के निधी वितरीत केल्याची माहिती मिळत आहे. योजना अपूर्ण ठेवुन जर तालुक्यातील आदिवासी बांधवांना पाणी मिळाले नाही तर मुंबईला जाणारे पाणी बंद करू असा आक्रमक पवित्रा लकी जाधव यांनी घेतला असुन योजना अपुर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

शेणवड बुद्रुक येथे जलजीवन योजनेचे काम करतांना संबंधित ठेकेदाराने थेट नदीत विहिरीचे काम केले आहे. नदीतील विहिरीतून एकदा पाणी उपसा केल्यावर पुन्हा विहिरीत लवकर पाणी जमा होत नाही. तसेच विहिरीपासून पाण्याची टाकी थेट पाच किमी अंतरावर असलेल्या उंच डोंगरावर बांधलेली आहे. अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Water problem in shenwad budruk tribal houses of igatpuri taluk is not solved news update nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2024 | 04:07 PM

Topics:  

  • daily news
  • Nashik News Update
  • Water Shortage

संबंधित बातम्या

तुमचं वाहनं जुनं झालं तरी घाबरु नका…! सुप्रीम कोर्ट आले वाहनधारकांच्या मदतीला धावून
1

तुमचं वाहनं जुनं झालं तरी घाबरु नका…! सुप्रीम कोर्ट आले वाहनधारकांच्या मदतीला धावून

अमली पदार्थांपासून शालेय मुलांना दूर ठेवावे अन्यथा परवाना रद्द; पान टपरी व्यावसायिकांना दिला सज्जड दम
2

अमली पदार्थांपासून शालेय मुलांना दूर ठेवावे अन्यथा परवाना रद्द; पान टपरी व्यावसायिकांना दिला सज्जड दम

दुध उत्पादक शेतकरी मेळावा उत्साहात पार; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला शेतकऱ्यांवर विश्वास
3

दुध उत्पादक शेतकरी मेळावा उत्साहात पार; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला शेतकऱ्यांवर विश्वास

Uttarakhand cloudburst : तीन तासांच्या विध्वंसात अख्खे गाव झाले बेचिराख; याचा उत्तरकाशीच्या पर्यटनावर होणार परिणाम?
4

Uttarakhand cloudburst : तीन तासांच्या विध्वंसात अख्खे गाव झाले बेचिराख; याचा उत्तरकाशीच्या पर्यटनावर होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.