
व्हर्टिगो: एक लक्षणीय संघर्ष
जागतिक आरोग्यक्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अबॉटने भारतातील सुमारे 7 कोटी लोकांना प्रभावित करणारा मात्र बहुतेकदा दुर्लक्षित राहून जाणारा संतुलनाशी संबंधित आजार व्हर्टिगोला ठळकपणे प्रकाशझोतात आणण्यासाठी ‘चक्कर को चेक कर’ नावाची मोहीम सुरू केली आहे. व्हर्टिगो म्हणजे एक अशी स्थिती, ज्यात लोकांना आपल्या अवतीभोवतीचे जग गरगरत असल्यासारखे वाटते. या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना आपल्या आरोग्याचे नियंत्रण आपल्या हातात घेता यावे आणि या स्थितीचे अधिक चांगले व्यवस्थापन करता यावे यासाठी त्यांची मदत करण्याचे अबॉटचे लक्ष्य आहे.(फोटो सौजन्य-istock)
जगाला व्हर्टिगोच्या दिशाभूल करणाऱ्या वास्तवाकडे पाहण्याचा एक झरोका उघडून देण्यासाठी अबॉटने डिजिटल फिल्मच्या माध्यमातून या मोहिमेची शानदार सुरुवात केली. या फिल्ममध्ये बॉलीवूड अभिनेता आणि युनिसेफचा भारतातील राजदूत आयुष्मान खुरानाचा समावेश आहे. व्हर्टिगोमुळे अचानक चक्कर येण्याच्या प्रकारांमुळे जगण्याचा तोल कसा बिघडून जाऊ शकतो याचे प्रत्ययकारी चित्रण या फिल्ममध्ये करण्यात आले आहे आणि या अनुभवातून गेलेल्या व्यक्तींना कृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
व्हर्टिगोचा वैयक्तिक अनुभव सांगताना आयुष्मान खुराना यांनी सांगितले, “व्हर्टिगोचा सामना करणे हे एक आव्हान होते, पण त्या अनुभवाने मला चिकाटीमधील शक्ती कळून आली. 2016 मध्ये मला व्हर्टिगो असल्याचे निदान झाले. तेव्हा झटक्यात केलेल्या कोणत्याही हालचालीमुळे माझ्या ओवतीभोवतीचे जग गरगरायचे. सतत सुरू असलेल्या धावपळीच्या फिल्म चित्रिकरणादरम्यान अचानक कधीही चक्कर येण्याची सततची भीती मनावर दडपण आणायची. मात्र योग्य औषधोपचार शोधल्याने आणि ध्यानधारणेची सवय लावून घेतल्याने मला ही स्थिती पूर्णपणे हाताळण्यास मदत झाली. ही स्थिती हाताळायला कठीण आहे असे आपल्याला वाटू शकते पण ही एक अशी लढाई आहे, जी तुम्ही निश्चित जिंकू शकता हे इथे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. माझी ही वाटचाल इतरांना हवी असलेली मदत शोधण्याची आणि नव्या आत्मविश्वासाने आपल्या जगण्यातून मार्ग शोधण्याची प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे.”
त्यांचा अनुभव असाधारण नाही. लक्षावधी लोक मूकपणे या स्थितीचा सामना करत आहेत आणि त्याला नेहमीची साधी चक्कर समजत आहेत. योग्य वेळी योग्य निदान व योग्य उपचार मिळणे आणि जीवनशैलीमध्ये काही महत्त्वाचे बदल करणे हे या स्थितीच्या व्यवस्थापनासाठी आणि आपल्या आरोग्यावर नियंत्रण राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
अबॉट इंडियाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. जेजो करणकुमार पुढे म्हणाले, “सुमारे 7 कोटी भारतीयांना व्हर्टिगोचा अनुभव येतो. संतुलनाशी संबंधित हा आजार लोकांच्या जीवनमानाच्या दर्जावर परिणाम करू शकतो हे खरे असले तरी त्याचे व्यवस्थापन शक्य आहे. व्हर्टिगोसोबत जगणाऱ्या व्यक्तींना वेळच्यावेळी वैद्यकीय सल्ला मिळावा आणि त्यांना एक परिपूर्ण आयुष्य जगता यावे यासाठी त्यांना या आजाराची लक्षणे ओळखण्यास मदत करणाऱ्या माहिती व साधनांनी सुसज्ज बनवून त्यांची या आजारासोबतची वाटचाल सोपी करणे हे अबॉटचे लक्ष्य आहे.”
या मोहिमेचा एक अविभाज्य भाग म्हणजे अबॉटने IQVIAच्या सहयोगाने हाती घेतलेला एक सर्व्हे. या सर्वेक्षणातून हाती आलेल्या निष्कर्षांमुळे भारतात व्हर्टिगोसोबत जगणाऱ्या व्यक्तींचे वास्तव समजून घेण्यास मदत होते. हे सर्वेक्षण मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे करण्यात आले, ज्यात 1250 व्यक्तींकडून माहिती मिळविण्यात आली. यात व्हर्टिगोचे रुग्ण आणि अशा व्यक्तींची काळजी घेणाऱ्या व्यक्ती तसेच कुटुंबामध्ये गरगरण्याचा अनुभव येत असलेल्या आणि अद्यापही या स्थितीचे निदान करून न घेतलेल्या सदस्यांचा समावेश होता.
व्हर्टिगो: एक लक्षणीय संघर्ष
कल्पना करा, आपल्याभोवतीचे जग अनियंत्रितपणे गरगरत आहे, त्यामुळे डोकेदुखी होत आहे, दुहेरी प्रतिमा दिसत आहेत आणि नजरेसमोर अंधारी आल्यासारखे वाटत आहे. व्हर्टिगोसोबत जगणाऱ्यांसाठी अशी स्थिती वास्तवात असते. या स्थितीचा लोकांच्या आयुष्यावर वैयक्तिकरित्या काय परिणाम होतो, तसेच त्यांच्या अवतीभोवती असलेल्या माणसांचे जगही त्यामुळे कसे प्रभावित होते यावर अबॉट आणि IQVIA च्या सर्वेक्षणातून प्रकाशझोत टाकला गेला आहे.
वैयक्तिक आयुष्य:
व्हर्टिगोमुळे फक्त गरगरत नाही तर त्याचा माणसांच्या वैयक्तिक आयुष्यावरही लक्षणीय परिणाम होतो, ज्यातील 34 टक्के लोकांना आयुष्यातील प्रमुख कामे रद्द करावी लागतात, 33 टक्के लोकांना वारंवार राग येतो किंवा चिडचिडेपणा जाणवतो आणि 26 टक्के लोकांना आपल्या कुटुंबीयांबरोबरच्या नात्याचे नुकसान होईल, अशी भीती वाटते.
निमित्ते :
व्हर्टिगोला निमित्त ठरणाऱ्या प्रमुख कारणांमध्ये चिंता किंवा ताणतणाव, प्रवास , आणि हवामानातील बदल यांचा समावेश होतो.
लक्षणे:
व्हर्टिगोच्या प्रत्येक झटक्यामध्ये अनेक लक्षणे समोर येऊ शकतात, ज्यात डोकेदुखी, दुहेरी प्रतिमा दिसणे, अंधारी आल्यासारखे वाटणे , डोके जड होणे, आणि मान दुखणे यांचा समावेश असतो.
कौटुंबिक आयुष्य आणि प्रवास :
व्हर्टिगोमुळे रुग्णाच्या आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि कुटुंबाबरोबर घालवायचा वेळ कमी होऊ शकतो. तसेच यामुळे सार्वजनिक वाहनांतून प्रवास किंवा विमानप्रवास करताना अस्वस्थ वाटू शकते.
हे सर्व परिणाम होत असूनही गरगरल्यासारखे जाणवत असलेल्या लोकांपैकी केवळ 48 टक्के लोकांच्याच लक्षणांची तपासणी होते. सरासरी 38 व्या वर्षी व्हर्टिगोचे निदान होते, ज्यातील एक चतुर्थांश रुग्णांना महिन्यातून एकदा याचा झटका येतो. व्हर्टिगोविषयी अनेक भ्रामक समजूती लोकांच्या मनात आहेत. 21 टक्के रुग्णांच्या मते हा आजार फक्त वयोवृद्ध व्यक्तींनाच होतो तसेच या आजार बरा होऊ शकत नाही व तो संसर्गजन्य आहे अशी समजूत 15 टक्के लोकांमध्ये आढळते. व्हर्टिगोच्या झटक्यांची शक्यता कमीत-कमी असावी यासाठी वाहनातून प्रवास टाळावा लागणे (34 टक्के) स्क्रीन टाइम कमी करणे (30 टक्के) इत्यादी दूरगामी परिणाम रुग्णांच्या वैयक्तिक आयुष्यावर होऊ शकतात, तरीही त्यांच्यापैकी केवळ निम्मे लोकच औषधे घेतात. ही आकडेवारी व्हर्टिगोसोबत जगणाऱ्यांना सामोऱ्या येणाऱ्या छुप्या संघर्षांचे चित्र ठळकपणे रेखाटते.