Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐश्वर्या रायचा आहे नणंद श्वेताशी 36 चा आकडा, नणंद-भावजयीमध्ये का होतात भांडणं, 6 मोठी कारणं

Bhabhi nanand Fight Reasons: अनेकदा नणंद आणि वहिनी यांच्यात मतभेद होतात किंवा काही कारणास्तव मत्सराची परिस्थिती निर्माण होते, जी वादाचे किंवा एकमेकांपासून दूर होण्याचे कारण ठरते. काय आहेत कारणं

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 16, 2024 | 05:09 PM
नणद भावजयीमध्ये भांडणं का होतात

नणद भावजयीमध्ये भांडणं का होतात

Follow Us
Close
Follow Us:

लग्नानंतर मुलगी जेव्हा सासरच्या घरी जाते तेव्हा ती त्या घरात पूर्णपणे नवीन असते. तिथं सासूशिवाय तिची नणंदेशीही गाठ पडते. वहिनी आणि नणंद यांच्यात वाद होणे हे अगदी सामान्य आहेत, जे भारतीय कुटुंबांमध्ये अनेकदा दिसून येतात. यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यामुळे नात्यात दुरावा येतो. 

खरं तर अनेक घरांमध्ये नणंदाची अधिक लुडबूड दिसून येते आणि त्यामुळेच घरामध्ये वहिनी आणि नणंदेचे नाते टिकत नाही. मात्र अशी अनेक कारणं आहेत, ज्यामुळे या नात्यात अधिक वाद होताना दिसतात. चला तर मग जाणून घेऊया, वहिनी आणि नणंद यांच्यात भांडणाची महत्त्वाची कारणे कोणती असू शकतात. (फोटो सौजन्य – iStock/Instagram) 

लक्ष न मिळणे 

बऱ्याचदा नणंदेला वाटतं की लग्नानंतर तिचा भाऊ तिच्याकडे लक्ष देत नाही जेवढं आधी द्यायचा. भावाच्या बायकोचा आयुष्यात प्रवेश झाल्यामुळे आपले हक्क कमी होत आहेत असेदेखील तिला वाटू शकते. तर एका बाजूला बायकोला असं वाटतं की आपला नवरा आपल्यापेक्षा त्याच्या आईला आणि बहिणीला अधिक मान देतोय आणि त्यांचीच बाजू ऐकून घेत आहे आणि मग त्यामुळे दुराव्याला सुरूवात होते. नवऱ्यापेक्षा बायकोचा नणंदेवरचा राग अधिक वाढतो आणि नणंदेला आपल्या भावातील हा बदल त्याच्या बायकोमुळे झाल्यासारखे वाटते. 

हेदेखील वाचा – प्रेमविवाह असूनही का तुटते नाते, तज्ज्ञांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही विचार कराल

पालनपोषणातील फरक 

नणंद आणि भावजय यांच्या पालनपोषणातील फरक हेदेखील भांडणांचं एक कारण असू शकते. पुष्कळ वेळा दोघींचाही जीवनाचा अनुभव, राहण्याची, बोलण्याची आणि वागण्याची पद्धत ही वेगळी असते. ज्यामुळे त्यांच्या मतांमध्ये मतभेद निर्माण होतात. परंपरा, नियम आणि घरातील कामांबाबत दोघांमध्ये मतभेद झाल्यास भांडणं वाढतात. 

गैरसमजुती 

गैरसमजुतीमुळे होतात भांडणं

घरातील छोट्या-छोट्या गोष्टींचे रूपांतर कधी कधी मोठ्या गैरसमजात होते. आपला आदर करत नाहीये असं वाटणं, एखाद्या लहानसहान गोष्टी मनात धरून ठेवणं, कोणत्याही गोष्टीचा चुकीचा अर्थ काढणं या गोष्टी वाढत जातात आणि नात्यातील गैरसमज वाढल्यामुळे भांडणं वाढतात. कधी कधी वेळीच गोष्टी न सोडविल्यास गुंतागुंत वाढताना दिसते. 

कुटुंबाच्या अपेक्षा 

नणंद आणि भावजय यांच्या नात्यात संघर्षाचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे कुटुंबाच्या अपेक्षा. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्यांवरून अनेक वेळा दोघांमध्ये वाद होऊ शकतो. वहिनीने नवीन घराचे नियम पाळणे अपेक्षित आहे. अशावेळी नणंदेला आणि भावजयीला घरातून वेगवेगळी वागणूक मिळते आणि त्याचे रूपांतर भांडणामध्ये आणि एकमेकांविषयी मनात राग निर्माण होण्यात होते. 

हेदेखील वाचा – जपानमध्ये लग्नाचा नवा ट्रेंड, प्रेम आणि शारीरिक संबंधाशिवायाचे नाते ‘फ्रेंडशिप मॅरेज’!

आईची वागण्याची पद्धत

सासू करते अधिक मतभेद

पुष्कळ वेळा सासू तिच्या सुनेपेक्षा तिच्या मुलीवर अधिक विश्वास ठेवते आणि दोघींमध्ये सतत तुलना करत राहते. मुलीची अवाजवी स्तुती करणे आणि सुनेची अवाजवी टीका करणे यामुळे नणंद भावजयीत मत्सर निर्माण होणे साहजिक आहे. नणंद आणि भावजय या दोघींपुढेही परिस्थिती अशी निर्माण होते की एकमेकांना समजून घेणे कठीण होते. 

Web Title: Aishwarya rai bachchan and shweta bachchan nanda rivalry know the 6 reason behind bhabhi nanand fights in family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 05:09 PM

Topics:  

  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय
1

Relationship Tips: वर्षानुवर्ष एकत्र असल्यावरही नातं का तुटतं? नात्यातलं गणित कुठे बिघडतंय

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र
2

Toxic लोकांना कसे काढाल आयुष्यातून बाहेर, Jaya Kishori ने दिल्या कमालीच्या टिप्स; रहाल भावनिकरित्या स्वतंत्र

मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध
3

मुलांच्या स्मार्टनेसवर मुली फिदा? हुशारी, नेतृत्व आणि नाते यात भले मोठे संबंध

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’
4

गर्लफ्रेंड नाही म्हणून उदास आहात? हे घ्या ‘गर्लफ्रेंड डे स्पेशल Tips’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.