Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

38 टक्के भारतीय पॅकेटबंद फूड खाऊन भरतायत पोट, धक्कादायक दुष्परिणाम

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना जेवणासाठी वेळ कमी आणि सोयीचे पर्याय जास्त मिळत आहेत. अशा परिस्थितीत पॅकेज्ड पदार्थ आणि तयार पदार्थांची मागणी झपाट्याने वाढली आहे. मात्र त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 17, 2024 | 10:30 PM
पॅकेज्ड फूड खाण्याने होणारे नुकसान

पॅकेज्ड फूड खाण्याने होणारे नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली कामाचा व्याप इतका वाढला आहे की, घरात जेवण करणे अशक्य होऊन बसलं आहे आणि त्याशिवाय बाहेर पॅकेज्ड फूडचे इतके पर्याय वाढले आहेत की ते खाण्यामध्येच भारतीय लोकांचा कल वाढला आहे. अशा परिस्थितीत पॅकेज्ड असणारे पदार्थ हवे असण्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. कोणालाही घरी हेल्दी जेवण बनविण्याइतका वेळच नाही. त्यामुळे असे पर्याय शोधले जातात. 

भारतातील अलीकडील अहवालानुसार, 38% लोक त्यांची भूक भागवण्यासाठी पॅक केलेले, खारट आणि तेलकट स्नॅक्स सारखे अस्वास्थ्यकर पदार्थ खातात. अमेरिकेच्या इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटने (IFPRI) जारी केलेल्या ‘ग्लोबल फूड पॉलिसी रिपोर्ट 2024: हेल्दी डाएट अँड न्यूट्रिशन’मध्ये ही चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

काय सांगतो अहवाल

अहवालानुसार, मुख्यत: खराब खाण्याच्या सवयींमुळे भारतातील 16.6% लोकसंख्या कुपोषणाने ग्रस्त आहे. 10 पैकी 4 भारतीय अनहेल्दी पॅकेज्ड फूड, तर फक्त दोन व्यक्ती या 5 शिफारस केलेल्या अन्न गटांचे सेवन करत आहेत. यामध्ये स्टार्चयुक्त पदार्थ, भाज्या, फळे, कडधान्ये आणि काजू यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश आहे.

हेदेखील वाचा – अनहेल्दी सोडा, सकाळच्या नाश्त्यात एनर्जीने भरलेल्या ‘या’ पदार्थांचा समावेश करा

साखर, सोडियम आणि फॅट्स पदार्थ

पॅकेज्ड फूडमध्ये कोणते पदार्थ अधिक

पॅकबंद खाद्यपदार्थ आणि स्नॅक्समध्ये अनेकदा साखर, चरबी आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ अत्यंत चविष्ट असतात, परंतु शरीरासाठी हानिकारक असू शकतात. त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो आणि सध्या भारतामध्ये या कारणामुळेच विविध आजारांना बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. 

काय आहे तज्ज्ञांचे मत 

पॅकेज्ड फूड खाणे हानिकारक का आहे

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पॅकेज्ड फूडमध्ये पोषक तत्वे कमी असतात, तर ताजी फळे, भाज्या आणि नैसर्गिक पदार्थ शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर देतात, जे निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक असतात. पॅकबंद स्नॅक्समुळे लोकांना लोह, जस्त आणि जीवनसत्त्वे यासारख्या सूक्ष्म पोषक घटकांची कमतरतादेखील होऊ शकते.

वेळ आणि चव वाचवण्यासाठी लोक आरोग्याशी तडजोड करत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आपल्या आहारात ताज्या आणि पौष्टिक गोष्टींचा योग्य वेळी समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपण या गंभीर आजारांपासून सुरक्षित राहू शकतो आणि निरोगी जीवन जगू शकतो.

हेदेखील वाचा – रोज हेल्दी समजून खाताय 5 पदार्थ वास्तविकता देईल धक्का, आरोग्याचे सर्वात मोठे शत्रू!

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Dangerous side effects of packaged food 38 percent indians eating unhealthy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 10:30 PM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी
1

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.