Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025 : काय सांगता ? देशातील एकमेव राज्य जिथे दिवाळी साजरी होत नाही, कारण जाणून चक्रावून जाल

देशातच नाही तर मायदेशाशी नाळ जोडलेले अनेक परदेशात गेलेले चाकरमानी त्या त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतात. मात्र भारतात असं एक ठिकाण नव्हे तर राज्य आहे जे दिवाळी साजरी करत नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 18, 2025 | 07:18 PM
Diwali 2025 : काय सांगता ? देशातील एकमेव राज्य जिथे दिवाळी साजरी होत नाही, कारण जाणून चक्रावून जाल
Follow Us
Close
Follow Us:
  • केरळ राज्यात जिथे दिवाळी साजरी होत नाही
  • कारण जाणून चक्रावून जाल
  • काय आहे या मागील गोष्ट ?
दिवाळी म्हणजे आनंदाच आणि उत्साहाचं वातावरण असतं. भारतात सणांची तशी काहीच कमी नाही, विविध जातीधर्मातील सण साजरे होतात मात्र एक सण असा आहे जो देशातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे साजरी करतात तो म्हणजे दिवाळीचा सण. केवळ देशातच नाही या मायदेशाशी नाळ जोडलेले अनेक परदेशात गेलेले चाकरमानी त्या त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतात. मात्र भारतात असं एक ठिकाण नव्हे तर राज्य आहे जे दिवाळी साजरी करत नाही.

दिवाळी म्हणजे रोषणाईचा सण मात्र केरळ हे असं राज्य आहे जिथे दिवाळी साजरी होत नाही. जरा विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. केरळमध्ये दिवाळी साजरी न करण्याचं पौराणिक आणि शास्त्रीय अशी दोन कारणं आहेत. पुराणकथेनुसार, असं म्हटलं जातं की, महाबली नावाचा एक असूरांचा राजा होता. हा असूर कुळातील असला तरी, त्याने प्रजेला कधीही त्रास दिला नाही. इतर असूरांसारखी ओरबाडून घेण्याची राक्षसी वृत्ती त्याची नव्हती. असुर कुळातील हा राजा दानशूर होता. या राजाच्या राज्यात प्रजा सुरक्षित असायची. असूर असला तरी महाबली विष्णूभक्त होता. त्याचा चांगुलपणा हीच त्याची सर्वात मोठी शक्ती होती. प्राचीन पुराणांमध्ये उल्लेखलेला एक पराक्रमी, दयाळू आणि धर्मनिष्ठ असुरराजा होता.महाबलीच्या राज्यात सर्वजण सुखी आणि समृद्ध होते. कुणालाही दुःख, किंवा अन्याय होत नव्हता. केरळात दिवाळी साजरी न करण्याचं कारण म्हणजे राजा महाबली ऐन दिवाळीत मृत्यू झाला आणि त्याच्यावरील प्रेमाखातर केरळात दिवाळी साजरी केली जात नाही.

Diwali 2025: “स्वराज्याचा थाटच न्यारा”;शिवरायांच्या काळात ‘अशी’ व्हायची दिवाळी साजरी

भगवान विष्णूंनी महाबलीला सुतळ लोकाचे अधिपत्य दिले आणि दरवर्षी पृथ्वीवर आपल्या प्रजेला भेट देण्याचा आशीर्वाद दिला. म्हणून केरळमध्ये आजही ओणम हा सण महाबलीच्या आगमनाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.महाबली असुराचा संदेश असा आहे की, खरा धर्म वंशात नसतो तर कर्मात असतो. दान, सत्य आणि विनय हेच खरे दैवी गुण आहेत. महाबली हा असुर असूनही आज “महान राजा” म्हणून पूजला जातो. याचकारणाने दिवाळी साजरी न करता ओणम साजरा केला जातो.

शास्त्रीय कारण

केरळात दिवाळी साजरी न करण्याचं शास्त्रीय कारण म्हणजे, तेथील भौगोलिक वातावरण. केरळ हा भारताच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर, म्हणजेच अरबी समुद्राच्या काठावर आहे.या प्रदेशात मान्सून पावसाचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. उत्तरेच्या राज्यात तसं होत नाही. शरद ऋतू पावसाळा संपून थंडीला सुरुवात झालेली असते, त्य़ामुळे थंडीत ऊब मिळावी म्हणून उत्तरेच्या राज्यात पणत्या लावून दिवाळी साजरी करण्याची पद्धत आहे. मात्र दाक्षिणात्य राज्यात तसं होत नाही. केरळमध्ये शरद ऋूतूत देखील पावसाळा काही अंशी असतो. त्यामुळे केरळात पणत्या लावून दिवाळी साजरी केली जात नाही.

Diwali 2025 : दिवाळी का साजरी करतात, फराळाला इतकं महत्व का ? काय आहे यामागची आख्य़ायिका ?

 

Web Title: Diwali 2025 why is diwali not celebrated in kerala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • Kerala

संबंधित बातम्या

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral
1

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral

Kerala Crime : आधी महिलेची निर्घृण हत्या, नंतर प्रियकराने उचललं टोकाचे पाऊल; घरातील दृश्य पाहून पोलिसही झाले थक्क
2

Kerala Crime : आधी महिलेची निर्घृण हत्या, नंतर प्रियकराने उचललं टोकाचे पाऊल; घरातील दृश्य पाहून पोलिसही झाले थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.