Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Babasaheb Ambedkar: बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार, जीवनाला मिळेल योग्य दिशा; नक्की वाचा 

महापरिनिर्वाण दिवस शनिवार 6 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी डॉ. बी.आर. आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे. हा दिवस समाजासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. महापरिनिर्वाण दिनांच्या दिवशी त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 06, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन शनिवार, 6 डिसेंबर रोजी आहे. हा दिवस भारतीय समाजासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिशी देशभरातील अनुयायी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि लाखो नागरिक त्याच्या स्मृतीला उजाळा देतात. यंदाचा महापरिनिर्वाण दिन 69 वा आहे. त्यांचे विचार आजही प्रत्येकाला उभारणी देणारे, प्रेरणा देणारे आणि सामाजिक परिवर्तनाचा दृढ मार्ग दाखवणारे आहेत.

बाबासाहेबांचे जीवन संघर्षांनी आणि कठोर मेहनतीने भरलेले होते. गरिबी, जातभेद आणि सामाजिक विषमता अनुभवूनही त्यांनी शिक्षणाला हत्यार बनवले आणि देशातील वंचित, शोषित समाजाला अधिकार, सन्मान आणि समानतेचे स्वप्न दिले. तसेच त्यांनी संपूर्ण जीवनभर समता, न्याय आणि बंधुता यांसाठी संघर्ष केला. शिक्षण, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तन हीच समाजाची खरी शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिन आपल्याला आठवण करून देतो की विचार कधीही मरत नाहीत; ते कृतीतून पुढे जगत राहतात.

महापरिनिर्वाण दिनाचे काय आहे महत्त्व

6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. सामाजिक न्याय, संवैधानिक लोकशाही आणि मानवी हक्कांमध्ये त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे. लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी या दिवशी एकत्र येतात. या दिवशी आपण केवळ त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत नाही, तर त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याची शपथ घेतो.

Budh Gochar: 6 डिसेंबरपासून या राशीच्या लोकांचे वाढणार संकट, बुधाच्या संक्रमणामुळे वाढणार त्रास

महापरिनिर्वाण दिन का साजरा केला जातो

डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला डॉ. आंबेडकरांचे विचार समजून घेण्यास, त्यांच्या शिकवणी स्वीकारण्यास आणि समान समाजाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या ध्येयांकडे काम करण्यास मदत करू शकतो

महापरिनिर्वाण दिनी प्रेरणादायी विचार

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा

बाबासाहेबांनी दिलेला हा मंत्र आजही तितकाच सामर्थ्यवान आहे. शिक्षण हेच मनुष्याचे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे त्यांनी दाखवून दिले. शिक्षण हे स्वातंत्र्याची गुरुकिल्ली मानली जाते. शिक्षण हेच व्यक्तीला बुद्धी, विवेक आणि आत्मविश्वास देणारे साधन आहे.

मनुष्य जन्माने नाही तर कर्माने महान होतो

समानतेची ही भावना समाजातील भेद मिटवून नवा मानवतावादी दृष्टिकोन देणारी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जात, पंथ किंवा जन्मामुळे श्रेष्ठता येत नाही. मनुष्याची ओळख त्याच्या कर्तृत्वात आणि सद्गुणांध्ये असते. हा त्यांचा विचारांचा मुलभूत संदेश आहे.

Lucky Gemstone: ‘ही’ शक्तिशाली रत्ने परिधान करा, मिळेल उत्तम पगार, प्रमोशनची संधी

जीवन महान बनवायचे असेल तर विचार महान ठेवा

सकारात्मक आणि प्रगतिशील विचारच परिवर्तनाची पायाभरणी करतात. ते नेहमी सांगतात की, अडथळे आणि सामाजिक मर्यादा कधीही थांबवू नयेत संघर्ष हा व्यक्तीला घडवणारा अनुभव आहे.

स्वत:वर विश्वास ठेवा; जग तुम्हाला स्वीकारेल

आत्मविश्वास आणि कष्ट यांच्या आधारेच आपण स्वतःचे भाग्य बदलू शकतो. त्यांच्या सांगण्यानुसार, स्वतःचा कमीपणा मानू नका, स्वतःची क्षमता ओळखा आणि धैर्याने पुढे जा. बाबासाहेबांचा हा संदेश आजच्या तरुणांसाठी खूप प्रेरणादायी असा आहे.

न्याय हा समाजाचा आत्मा आहे

जेथे अन्याय असेल तेथे शांतता कधीच नांदू शकत नाही. त्यामुळे सामाजिक न्यायासाठी लढणे हे आपले कर्तव्य आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे का आहेत

    Ans: बाबासाहेबाचे विचार सामाजिक समता, शिक्षण, मानवाधिकार, न्याय आणि स्वाभिमानावर आधारित असल्यामुळे आजच्या पिढीसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे

  • Que: शिक्षणाबद्दल बाबासाहेबांचा सर्वांत प्रसिद्ध संदेश कोणता

    Ans: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा सर्वांत प्रभावित संदेश आहे. जो व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला दिशा देतो

  • Que: समाजासाठी बाबासाहेबांनी दिलेला मुख्य संदेश कोणता

    Ans: समाजात बंधुतेची भावना, न्याय समानता आणि न्याय या मूल्यांवर आधारित आहे

Web Title: Dr babasaheb ambedkars inspirational thoughts that can guide your life in the right direction a must read

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • babasaheb ambedkar
  • Dr. Babasaheb Ambedkar
  • Mahaparinirvan Din

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.