
फोटो सौजन्य AI
पण खाद्यपदार्थांच्या इतिहासात डोकावलं तर काही प्रसिद्ध पदार्थ भारतात बाहेरून आले आणि कालांतराने ते आपल्या संस्कृतीचाच भाग बनले.
आज समोसा म्हटलं की बटाटा, मटार, मसाले आणि वरून कुरकुरीत आवरण हे ठरलेलंच. पण पूर्वीच्या समोशात बटाट्याचा प्रश्नच नव्हता. कारण बटाटा भारतातच नंतर आला. समोशाचा संबंध मध्य आशिया आणि पश्चिम आशियातील जुन्या पदार्थांशी जोडला जातो. प्रवासी आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून तो भारतीय उपखंडात पोहोचला. त्यानंतर भारतीय मसाले आणि बटाट्याची भर पडली आणि आपला आजचा ‘आलू समोसा’ जन्माला आला.
गरम जलेबी आणि त्यावर ओतलेला पाक पाहिला की तोंडाला पाणी सुटतं. पण जलेबीचंही मूळ भारताबाहेर असल्याचं मानलं जातं. पश्चिम आशियातील ‘जलेबिया’सारख्या मिठाईच्या प्रकारांशी तिचं नातं जोडलेलं आहे. भारतात आल्यानंतर तिच्या चवीत आणि बनवण्याच्या पद्धतीत बदल झाले आणि ती आपल्या सण-उत्सवांची खास मिठाई बनली.
बिर्याणीबाबत तर अनेक कथा सांगितल्या जातात. तिच्या नेमक्या उगमावर एकमत नाही. मात्र पर्शियन आणि मध्य आशियाई खाद्यपरंपरेचा तिच्यावर प्रभाव असल्याचे मानले जाते. भारतात आल्यानंतर हैदराबादी, लखनवी, कोलकाता अशा अनेक प्रकारांनी तिचं रूपच बदलून टाकलं.
घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
नान आज उत्तर भारतातील जेवणात अगदी सहज दिसतो. पण त्याचाही संबंध पर्शियन आणि मध्य आशियाई खाद्यपरंपरेशी जोडला जातो. भारतात तंदूर आणि स्थानिक पद्धतीमुळे त्याला वेगळीच ओळख मिळाली.
गुलाबजामुनचंही काहीसं असंच आहे. आज लग्नसमारंभ असो किंवा जेवणानंतरची मिठाई, गुलाबजामुनला खास मागणी असते. त्याच्या नावावर आणि जुन्या पाककृतींवर पर्शियन प्रभाव दिसतो; मात्र भारतात खवा वापरून तयार झालेल्या प्रकाराने त्याला पूर्णपणे वेगळी ओळख दिली.
म्हणजेच, या पदार्थांची सुरुवात कुठेही झाली असली तरी भारतात आल्यावर त्यांना मिळालेली चव आणि ओळख इतकी खास आहे की आज ते परदेशी आहेत, असं सांगितलं तर कुणालाही पटणार नाही !