Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विवाहित लोकांना असतो गोष्टी विसरण्याचा आजार… ‘काय म्हणते संशोधन?’ जाणून घ्या

संशोधनानुसार विवाहित लोकांना डिमेंशिया होण्याचा धोका अविवाहितांपेक्षा अधिक असतो, कारण विवाहानंतर सामाजिक सहभाग कमी होतो व मानसिक ताण वाढतो. डिमेंशिया टाळण्यासाठी मानसिक सक्रियता, व्यायाम व संतुलित जीवनशैली आवश्यक आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 18, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

काही संशोधन झाले आहेत त्यानुसार विवाहित लोकांना विसराळूपणा अर्थात डिमेंशिया होण्याचा धोका अविवाहितांपेक्षा जास्त असतो. हे संशोधन अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीने केले असून, यात २४,००० हून अधिक अमेरिकन नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. हे सर्व लोक चार गटांमध्ये विभागले गेले होते: विवाहित, अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा किंवा विधुर. तब्बल 18 वर्षांपर्यंत त्यांच्या आरोग्यावर संशोधकांनी बारकाईने लक्ष ठेवले आणि या दीर्घकालीन अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर आला. त्यानुसार, जे लोक अविवाहित होते म्हणजेच जे एकटे राहत होते किंवा घटस्फोट घेतले होते, त्यांना डिमेंशिया होण्याचा धोका विवाहित लोकांच्या तुलनेत सुमारे 50 टक्क्यांनी कमी होता. ही माहिती अनेक लोकांना आश्चर्यचकित करणारी आहे, कारण आजवर असे मानले जात होते की, विवाहित लोक अधिक आनंदी, सुरक्षित आणि मानसिकदृष्ट्या स्थिर असतात.

‘Good Friday’ दिवस म्हणजे प्रभू येशूच्या बलिदानाचा दिवस! पण या दिवसाला ‘Good’ का म्हंटले जाते? जाणून घ्या

डिमेंशिया ही एक गंभीर आणि हळूहळू वाढणारी मेंदूविकाराची स्थिती आहे, जिचा परिणाम व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर, विचार करण्याच्या क्षमतेवर आणि निर्णय घेण्यावर होतो. यामध्ये अल्झायमर, व्हॅस्क्युलर डिमेंशिया, पार्किन्सन्स अशा अनेक मेंटल डिसऑर्डर्सचा समावेश होतो. 60 वर्षांवरील व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. भारतात सध्या अंदाजे 40 लाखांहून अधिक डिमेंशिया रुग्ण आहेत, तर जगभरात ही संख्या 5.5 कोटींपेक्षा जास्त आहे.

डिमेंशियाचे लक्षणे हळूहळू दिसू लागतात. उदाहरणार्थ, एखादी वस्तू कुठे ठेवली हे विसरणे, घराचा रस्ता विसरणे, छोट्या छोट्या निर्णयांमध्ये गोंधळणे, दिवसेंदिवस मूडमध्ये बदल जाणवणे, तसेच एकावेळी एकच काम नीट करता येणे अशा त्रासांची सुरुवात होते. हे लक्षणे सुरुवातीला सामान्य वाटू शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

मोठंमोठे सेलेब्रिटीही आहारात करतात ABC ज्यूसचा समावेश; त्वचेच्या अनेक समस्या करते दूर; पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

या आजाराच्या मुख्य कारणांमध्ये मेंदूला झालेला स्ट्रोक किंवा दुखापत, व्हिटॅमिन्सची कमतरता, ब्रेन ट्यूमर, थायरॉईडचा असंतुलन, वाढते वय आणि नशेचे व्यसन यांचा समावेश होतो. याशिवाय मानसिक ताणतणाव आणि सामाजिक एकटेपणाही मेंदूवर प्रतिकूल परिणाम करू शकतो. संशोधकांच्या मते, विवाहानंतर बहुतांश लोकांचे जीवन त्यांच्या कुटुंबापुरतेच मर्यादित होते. ते सामाजिक उपक्रमांमध्ये कमी सहभागी होतात, बाहेरील जगाशी संपर्क कमी होतो आणि परिणामी त्यांच्या मेंदूवर मानसिक भार वाढतो. शिवाय, नातेसंबंधांतील जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि तणाव यामुळेही ब्रेनवर प्रेशर येते. याउलट, अविवाहित लोक अधिक स्वतंत्र असतात, त्यांना वेळेचे बंधन कमी असते, ते फिरायला, मित्रमैत्रिणींमध्ये वेळ घालवायला मोकळे असतात आणि त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य तुलनेने चांगले राहते.

डिमेंशिया टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. जसे की रोज व्यायाम किंवा योगासन करणे, संतुलित आणि पोषणमूल्यांनी भरलेला आहार घेणे, वजन नियंत्रणात ठेवणे, दारू आणि सिगरेट यांसारख्या व्यसनांपासून दूर राहणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणे व सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे. मेंदू जितका सक्रिय राहील, तितका तो दीर्घकाळ निरोगी राहतो.

Web Title: Married people tend to forget things

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • relationship advice

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.