Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Most Dangerous Jobs : भारतातील सर्वात भायनक जॉब; ‘इथे’ काम करणं बेतू शकतं जिवावर

भारतात अशा अनेक नोकऱ्या आहेत ज्या अत्यंत भायनक, धोकादायक आणि मानसिक-शारीरिकदृष्ट्या कठीण मानल्या जातात. या नोकऱ्या करणाऱ्या व्यक्ती रोज मृत्यूला सामोरं जात असतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 26, 2026 | 05:29 PM
Most Dangerous Jobs :  भारतातील सर्वात भायनक जॉब; ‘इथे’ काम करणं बेतू शकतं जिवावर
Follow Us
Close
Follow Us:

आजकाल सोन्या चांदीपेक्षा सर्वात जास्त महत्वाचं आणि महागडं काय असेल तर ते म्हणजे जॉब. देशात सुशिक्षित तरुणांची काही कमी नाही पण कमी आहे ते चांगल्या जॉबची. घर-कुटुंब सांभाळावं आणि जबारदाऱ्या पार पाडाव्यात यासाठी खुप जणं पडेल ते काम करतात. देशात असे काही जॉब अनेकजणं करतात जे जीवावर बेतणारे आहेत. असा जीवावर बेतणणारा जॉब करणारे देखील तितकेच धाडसी आणि कर्तव्यदक्ष आहेत. कोणते आहेत जॉब चला तर मग जाणून घेऊयात.

असा जीवावर बेतणारे जॉब करणारे ही माणसं देखील तितेकीच खंबीर मनाचे असतात. त्यांची नोकरी म्हणजे केवळ पगार मिळवण्याचे साधन नाही, तर ती अनेकदा जीव धोक्यात घालून स्विकारलेली जबाबदारी असते. भारतात अशा अनेक नोकऱ्या आहेत ज्या अत्यंत भायनक, धोकादायक आणि मानसिक-शारीरिकदृष्ट्या कठीण मानल्या जातात. या नोकऱ्या करणाऱ्या व्यक्ती रोज मृत्यूला सामोरं जात असतात.

Travel Alert: हिमाचलमध्ये हिमवृष्टीचा निसर्गमय सोहळा! शिमला-मनालीत शुभ्र चादरीत लपेटले; पण ‘हे’ 5 मुख्य रस्ते झाले बंद

खाणकामगार

कोळसा किंवा इतर खनिजांच्या भुयारी खाणींमध्ये काम करताना दरड कोसळणे, विषारी वायू, ऑक्सिजनची कमतरता यांचा मोठा धोका असतो. अनेक वेळा अपघातात कामगारांचा मृत्यू होतो. ही माणसं रोज मृत्यूच्या सावटाखाली जगत असतात. येणारा प्रत्येक दिवस हा त्यांच्या आयुष्याच्या शेवटाचा कधी असू शकेल हे सांगता येत नाही.

सफाई कामगार

सफाई कामगाारांना अनेकदा तुच्छतेने वागवलं जातं. पण हीच माणसं देशाच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात. स्वत: घाणीत उतरुन गटारसाफ करणं, रोजच्या रोज सार्वजनिक शौचालयं साफ करणं हे त्यांच्या आरोग्यावर बेतणारं असतं. मात्र तरी ही माणसं काटेकोरपणे आपलं काम करतात. देशाच्या स्वच्छतेसाठी यांचं समाजकार्य मोठं आहे. भारतामध्ये अजूनही काही ठिकाणी सांडपाणी साफ करणारे कामगार अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करतात. विषारी वायूंमुळे त्यांचे आरोग्य आणि जीव दोन्ही धोक्यात येतात.

सुरक्षा यंत्रणा

देशाच्या सुरक्षेसाठी काम करणारे बॉम्ब निकामी करणारे तज्ज्ञ हे कायमच मृत्यू हातावर घेऊन वावरत असतात. यांचे काम तर क्षणात जीव घेऊ शकणारे असते. एक छोटीशी चूक त्यांच्यासह इतरांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरु शकते. देशाचे सीमा भाग सुरक्षित राहावेत यासाठी भारताचे सैन्यदल सदैव तत्पर असतं. शत्रूशी लढताना या वीर जवानांना जीवाची बाजी लावत नैसर्गिक आपत्तींना देखील सामोरं जावं लागतं. याला अपवाद अग्नीशमक दल आणि पोलीस यंत्रणा देखील नाही. आगीमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालतात. धूर, उष्णता आणि इमारत कोसळण्याचा धोका नेहमीच असतो. तसेच लाईनमन म्हणजे उच्चदाब वीजवाहिन्यांवर काम करणारे कर्मचारी यांचा हाय व्होल्टेजमुळे मृत्यू देखील होऊ शकतो. नौदलात कर्तव्य बजावणारे आणि मासेमारी करणारे बांधव खोल समुद्रात वादळी वाऱ्याची जोखीम उचलत जीवावर उदार होत काम करतात.

शेतकरी

जगाचा पोशिंदा कोण तर बळीराजा हे कायमच शाळेत शिकवलं जातं. पण हेच शिक्षण आता शाळेच्या परिक्षेत मार्क मिवण्यापुरतं राहिलं आहेे. ज्याच्या शेती करण्याने पोटभऱ खायला मिळतं तोच शेतकरी काबाडकष्ट करुनही कायमच आर्थिक समस्येला सामोरं जातो. दुष्काळाने असलं नसलं पीक खराब झालं तर याच शेतकऱ्याला जीव देण्यापलीकडे पर्याय उतर नाही. जो प्रत्येकाचं पोट भरतो तोच उपाशी मरतो हे शेतकऱ्याच्या जगण्याचं दुख आहे. असा हा धाडसी जॉब करणारे खरे देशाचे रत्न आहेत आणि त्यांच्या या कर्यामुळे आज देशातील प्रत्येक जण सुरक्षित आयुष्य जगत आहेत.

या दिवशी सामान्य जनतेसाठी खुले होणार आहे राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान; एंट्री असेल फ्री, जाणून घ्या बुकिंग प्रोसेस

 

 

Web Title: Most dangerous jobs in india information in maraathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • jobs
  • LIFESTYLE

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.