Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Love Marriage असो वा अरेंज मॅरेज, का तुटत आहेत नाती? प्रेमानंद महाराजांनी दिले मोठे कारण

दिवसेंदिवस लग्न करून खून, घटस्फोट या घटना अधिक ऐकू येत आहेत. आजच्या युगात, तरुण-तरुणी एकतर प्रेमविवाह करत आहेत किंवा अरेंज्ड मॅरेज करत आहेत, दोन्ही विवाह टिकत नाहीत, प्रेमानंद महाराजांनी सांगितले कारण

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 17, 2025 | 04:21 PM
प्रेमानंद महाराजांनी सांगितली लग्न न टिकण्याची कारणे

प्रेमानंद महाराजांनी सांगितली लग्न न टिकण्याची कारणे

Follow Us
Close
Follow Us:

राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे लग्न इंदूरमध्ये मोठ्या थाटामाटात झाले. ते एक अरेंज्ड मॅरेज होते. दोघेही हनिमूनला गेले होते, पण तिथून राजा रघुवंशीच्या हत्येची बातमी आली, ज्यामध्ये सोनम रघुवंशीवर तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. राजाच्या हत्येचा अँगल तिचा प्रियकर राजमुळे समोर आला आहे. तर दुसरीकडे मेरठमध्ये पत्नी मुस्कानने तिच्या पती सौरभच्या शरीराचे तुकडे केले आणि ते निळ्या ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट लावले. मुस्कान आणि सौरभचा प्रेमविवाह होता, असं असूनही मुस्कानने साहिलच्या प्रेमात पडून तिच्या पतीची हत्या केली. 

आजच्या काळात अरेंज्ड मॅरेज आणि लव्ह मॅरेजची अनेक प्रकरणे आढळतील, ज्यात नाती तुटत आहेत, स्वतःच्या इच्छेनुसार लग्न केल्यानंतरही तरुण-तरुणींचे नाते मजबूत नाही. एका महिलेने वृंदावनच्या संत प्रेमानंद जी महाराजांना विचारले की, आजच्या काळात तरुण-तरुणी स्वतःच्या इच्छेनुसार लग्न करतात की पालकांच्या इच्छेनुसार, दोन्ही परिस्थितीत परिणाम चांगले नसतात? असं का? यावर प्रेमानंद महाराजांनी विचार करायला लागेल असं उत्तर दिलं (फोटो सौजन्य – iStock) 

भूतकाळातील प्रेमसंबंधाबद्दल आपल्या लाईफ पार्टनरला सांगितले पाहिजे की नाही? प्रेमानंद जी महाराज यांचे विचार काय? सविस्तर माहिती

नाती न टिकण्याची कारणे 

या प्रश्नावर प्रेमानंद महाराज यांनी अत्यंत मुद्देसूद उत्तर दिले. ज्यावर सर्वांनीच विचार करणे गरजेचे आहे. आजच्या मुला-मुलींचे चारित्र्य शुद्ध नाही. समजा, जेव्हा आपल्याला चार हॉटेलचे जेवण खाण्याची सवय लागली असेल, तेव्हा घरच्या स्वयंपाकघरात शिजवलेले अन्न चवदार राहणार नाही. जेव्हा एखाद्याला चार पुरुषांना भेटण्याची सवय लागली असेल, तेव्हा एखाद्याला एका पतीला स्वीकारण्याची हिंमत होणार नाही. त्याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीने चार मुलींशी व्यभिचार केला तर तो आपल्या पत्नीवर समाधानी राहणार नाही. म्हणून त्याला चार मुलींशी व्यभिचार करावा लागेल कारण त्याने ती स्वतःला आणि मनाला सवय लावली आहे आणि यामुळेच नातं टिकत नाही. 

प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, 100 पैकी दोन किंवा चार मुली अशा असतील ज्या शुद्ध जीवन जगून स्वतःला एका पुरूषाला समर्पित करतील. चार मुलांना भेटलेली मुलगी खरी सून कशी होऊ शकते? चार मुलींसोबत नात्यात असलेला मुलगा खरा नवरा बनू शकेल का? असे प्रश्नही त्यांनी यावेळी विचारले

पवित्रतेसाठी जीव अर्पण

प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, जेव्हा मुघलांनी हल्ला केला तेव्हा महिलांनी त्यांच्या पवित्रतेसाठी आपले प्राण अर्पण केले पण त्यांच्या शरीराला स्पर्श होऊ दिला नाही. आज मात्र परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे… हे सर्व काय आहे? आपल्या देशात अशी भावना निर्माण होती की, आपल्या पतीसाठी आपले प्राण अर्पण करावेत की आपण आपला जीव गमावला तरी माझ्या पतीच्या केसालाही इजा होऊ नये आणि आता अशी परिस्थिती आलीये की पत्नीच पतीचा जीव घेत सुटली आहे. 

Dream science: स्वप्नात लग्न होताना दिसणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

पवित्र असेल तर वरदानच

ते म्हणाले की, नवरा आणि बायको ही एकमेकांचे जीवन असतात. आपल्या देशातील ही परिभाषा कुठे लुप्त झाली आहे? आता मुलगा किंवा मुलगी हे दोघेही शुद्ध असतील तर तुम्ही तुमचे नशीबच चांगले समजावे अथवा वरदान मिळाले आहे असंच समजावे. सध्या सगळंच विचित्र असून दोन्ही लग्नांमध्ये प्रेम, विश्वास आणि काळजी नसेल, आदर नसेल तर दोन्ही टिकू शकत नाही असं त्यांनी सांगितले आहे. 

प्रेमानंद महाराजांनी सांगितले वास्तव 

Web Title: Premanand maharaj shared big reason of relationship failure not being successful in love marriage or arranged marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • Arranged Marriage
  • Love Marriage
  • Premanand Maharaj
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल
1

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल

Physical Relation: शारीरिक संबंध ठेवल्याने नातं सुधारतं का? तज्ज्ञांनी केला खुलासा
2

Physical Relation: शारीरिक संबंध ठेवल्याने नातं सुधारतं का? तज्ज्ञांनी केला खुलासा

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!
3

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!

प्रेमानंद महाराज वाढदिवसाला का म्हणाले शोक साजरा करण्याचा दिवस? कशाप्रकारे साजरा करायला हवा Birthday?
4

प्रेमानंद महाराज वाढदिवसाला का म्हणाले शोक साजरा करण्याचा दिवस? कशाप्रकारे साजरा करायला हवा Birthday?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.