Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“म्हातारी मेलीये… तरी बी जिवंत!” तीन रात्रींचा थरार… सकाळी मृत्यू तर रात्री शरीर होते जागे

रिटा आणि तिचे कुटुंब! गावी जातात आणि गावाकडे राहणारी त्यांची आजी! त्या रात्रीचा तो थरार! वाचा या भयकथेतून...

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 24, 2025 | 10:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मे महिना आला तर गावी जाण्याची आस लागते. ही आस कोकणकरांसाठी काही नवीन नाही. संपूर्ण बालपण जरी मुंबई पुण्यासारख्या शहरात गेले, तरी गावी जाण्याची हौस प्रत्येकाला लागून असते. तशीच काही तरी इच्छा रिटाची होती. रिटा तशी १२ वर्षांची चिमुकली! मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणून आई वडिलांकडे गावी जाण्याचा हट्ट धरला. तिच्या या हट्टापोटी आई वडिलांनी गावी जाण्याचा निर्णय मान्य केला.

कोकणातील मंडणगड तालुक्यात रिटाच्या वडिलांचे गाव होते. रीटाला आजोबा नाही आहेत. तिच्या गावी फक्त तिची आजी राहत असे. गावचा घर आणि थोडी काही बाग जमीन, इतकाच काय तो आजीचा संसार! सगळी मुलं बाळं मुंबईत असल्याने गावचा सांभाळ करण्यासाठी आजीबाई गाव काही सोडायला मागत नव्हती. रिटा आजीची लाडकी! रीटालाही आजीला भेटण्याची आस होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी रिटा आणि तिचे आईवडील गावाकडे रवाना होतात. रिटा फार उत्सुक असते. घरातच गाडी असल्याने ते संध्याकाळच्या सुमारास गावाकडे निघाले असतात.

‘कलेजी खाण्याच्या नादात त्याने काळीज फाडून खाल्ले…” कोकणातील ‘ती’ रात्र आणि चकवा

मंडणगड तसा मुंबईपासून साडे ४ ते ५ तासांच्या अंतरावर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही लोकं गावी येऊन पोहचतात. पण त्यावेळी त्यांना दार थोटवून आत घरी जाण्याची गरज भासत नाही. कारण दार आधीच उघडे असते. त्यांचे घर हे जुने मातीचे असते. घरात पाऊल ठेवताच त्यांना एक भयाण शांतता जाणवते. घरात पोहचताच ते आजीला आवाज देतात. “आई… तू कुठे आहेस?”. पण आतून आजीचे उत्तर येत नाही. शोधता शोधता रिटा मागच्या दारात जाऊन पोहचते. तेव्हा तिला तिथे आजी चुली जवळ एकटक बसलेली दिसते. आजी पूर्णपणे शांत असते. रिटा आजीला हाक मारते पण आजी काहीच उत्तर देत नाही. रिटा इतरांना मागच्या दारात येण्यास सांगते. इतर सगळी मंडळी मागच्या दारात येऊन थांबते. आजीला हाक मारतात पण आजी कोणालाही काहीच उत्तर देत नाही.

अनेक प्रयत्नांनंतर सगळी जणं बाहेर येऊन बसतात. आजी बोलत का नाहीये? आपल्याकडे बघत का नाही? या सगळ्या प्रश्नांनी त्या तिघांचे डोकं त्रासून जातं. पहाट होत आलेली असते. आजी मागच्या दारातून बाहेर येते. कुणाकडे पाहतही नाही. अगदी मंद पावलांनी बाहेर येत आजी तिच्या खोलीत जाते. सगळीजणं तिच्या पाठोपाठ आजीच्या खोलीत जातात. आजी कुणाशी काही न बोलता, तिच्या गादीवर जाऊन पडते आणि डोळे मिटून घेते. पाहता पाहता सकाळ होते. रिटा आणि तिचे आई-वडील त्यांच्या खोलीत आराम करत असतात. रिटाची आई उठते, स्वयंपाक घरात जाते. सगळं हुरकून रिटा आणि तिच्या वडिलांना नाश्त्यासाठी उठवते. रिटाची आई आजीला उठवण्यासाठी आजीच्या रूममध्ये जाते. पण अनेकदा हाक मारूनही आजी काही उठेना. आजीच्या अंगाला हात लावले असता आजीचे अंग गरम पडलेले असते.

रिटाची आई रिटाच्या बाबांना हाक मारते आणि आजीच्या रूममध्ये येण्यासाठी सांगते. रिटाचे बाबा आजीला उठवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात पण आजी काही उठत नाही. पण आजीचे शरीर तापलेले असल्याने आणि रात्री ज्या पद्धतीने आजी वागत होती, ते पाहता रिटाचे बाबांना वाटत की, “आजीला ताप आला आहे. झोपली आहे. झोपू दे. नंतर उठेल.” त्यांच्या गावापासून तालुक्याचे ठिकाण तसे लांब! तसेच गावी कुणी डॉक्टर किंवा वैद्यही नाही.

संध्याकाळचे सात वाजतात. आजी अचानक उठून तिच्या खोलीतून बाहेर येते. आजी मंद पावलांनी मागच्या दारात जाऊन चुलीशी बसते. रिटा असो, रिटाचे बाबा असो किंवा रिटाची आई… सगळीजणं तिला हाक मारतात पण म्हातारी अशी वागत असते जसे तिला या घरात कुणी दिसतच नसतं. घरामध्ये एक वेगळीच शांतता असते. बत्तीची वेळ असल्याने रिटाचे बाबा घरी देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावतात. तेव्हा आजी मागच्या दारात अचानक ओरडू लागते. पण आजी ज्या आवाजात ओरडत असते, तो आवाज आजीचा नसतोच. एका वेगळ्याच आवाजात आजी मागच्या दारात किंचाळत असते. रिटा आणि रिटाची आई स्वयंपाक घरातून पळत बाहेर येतात. दोघेही घाबरलेले असतात. रिटाचे बाबा आजीला काय झालंय हे पाहण्यासाठी मागच्या दारात जातात. पण त्यांना पाहताच आजी आणखीन जोरजोरात किंचाळू लागते. आजीचे डोळे लालभून झालेले असतात. रिटाच्या बाबांना हे प्रकरण काय ठीक वाटत नाही. रिटाचे बाबा शैतान अवस्थेत असणारी आजी आत घरी येऊ नये म्हणून मागचा दार लावून घेतात.

कधी धड तर कधी मान! रात्रीचा थरार… खारदांड्याचा ‘तो’ परिसर

रिटाचे बाबा शेजारच्या वाडीत असणाऱ्या एका तांत्रिकाकडे पळत जातात. त्यांना कालपासून घडलेली सगळी घटना समजवतात. तेव्हा त्या तांत्रिकाचे उत्तर हेच असते की, “तुझ्याघरी जी म्हातारी आहे, ती तुझी आई नाही. तुझी आई जाऊन ३ दिवस झाले आहेत.” रिटाचे बाबा म्हणतात, “पण हे कसं शक्य आहे? काल मी स्वतःच्या डोळ्यांनी माझ्या आईला चालताना पाहिले आहे, मागच्या दारात बसलेले पाहिले आहे.” तेव्हा तांत्रिक म्हणतो की, “ते शरीर तुझ्या आईचेच आहे. पण तुझ्या आईच्या आत्म्याने ते शरीर तीन दिवसाअगोदरच सोडले आहे आणि वेळीच अग्नी न मिळाल्यामुळे एका भटक्या आत्मेने त्या शरीरात प्रवेश केला आहे. आता जी कुणी तिथे आहे, ती मुळीच तुझी आई नाही. म्हणून वेळ दवडू नकोस. तो सैतान… सगळ्यांना गिळून टाकेल.”

तांत्रिक आणि रिटाचे बाबा दोघेही पळत रिटाच्या घरी येतात. मागच्या दारातून दार ठोठावण्याचा आवाज सारखा येत असतो. तो राक्षसी आवाज त्यांच्या कानावर पडत असतो. रिटा आणि रिटाची आई तर घाबरून देवाचे नामस्मरण करत अंगणात एकमेकांना मिठी मारून बसलेले असतात. तांत्रिक मागच्या दारात जाऊन मंत्रोपचारने त्या शरीराची त्या आत्म्यापासून सुटका करतो. जशी ती आत्मा त्या शरीरातून मुक्त होते, तसे आजीचे शरीर लुळे पडते. रिटाचे बाबा पळत, आजीकडे जातात. आजीला स्पर्श करून पाहतात तर आजीचे तापलेले शरीर थंड पडलेले असते. येत्या सकाळी कसलाही वेळ न दवडता, आजीच्या शवाला अग्नी दिली जाते.

(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)

Web Title: The died granny horror story of konkan in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • ghost
  • horror places
  • kokan

संबंधित बातम्या

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या
1

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका
2

हे आहे जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या; चुकूनही इथे जाण्याचा विचार करू नका

Horror Story : श्श्श्श…कोई है! गडद अंधार आणि काळ्या साडीतल्या चार बायका! रिंगण घालत केलं असं काही…; मात्र पुढे जाताच…
3

Horror Story : श्श्श्श…कोई है! गडद अंधार आणि काळ्या साडीतल्या चार बायका! रिंगण घालत केलं असं काही…; मात्र पुढे जाताच…

‘भुतांचे बेट’ पावलापावलावर फक्त हॉरर अनुभव! येथे जाल तुमच्या मर्जीने पण परत येणे ‘त्यांच्या’ हातात
4

‘भुतांचे बेट’ पावलापावलावर फक्त हॉरर अनुभव! येथे जाल तुमच्या मर्जीने पण परत येणे ‘त्यांच्या’ हातात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.