दहावी बोर्ड परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावत ९७.६२ टक्के निकालाची शानदार नोंद केली आहे. यंदाही मुलींनी टक्केवारीत बाजी मारत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन सुमारे 80 टक्क्यांनी घटले आहे. परिणामी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बाजारात हापूसची आवक अत्यल्प होती.
भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाषण केले. पण भाषण संपल्यानंतर गडकरी पुन्हा माईककडे आले. नितीन गडकरींनी कोकणासाठी कोणती घोषणा केली पाहा...
कोकणात बनवलेले जाणारे पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर असतात. चला तर जाणून घेऊया कोकणी पद्धतीमध्ये केळीच्या पानात भाजलेला बांगडा बनवण्याची सोपी रेसिपी.
भारताच्या मत्स्यशेतीच्या क्रांतीमध्ये महाराष्ट्राने आपले महत्त्वाचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याने तब्बल 7 हजार 343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात केली आहे.
Biharच्या ग्रामीण भागात ‘पंडुबा’ नावाची भयानक लोककथा प्रसिद्ध आहे. पंडुबा पाण्यात राहणारी अमानवी शक्ती असून ती ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजात लोकांना फसवते.
शिमग्याच्या आधी अनिकेतने shortcut घेत शापित झाडाजवळ गाडी वळवली आणि नकळत एका शक्तीला मुक्त केलं. झाडावरच्या भयानक बाईचा अनुभव आणि आईचं विचित्र वागणं पाहून त्याला सत्य समजलं.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा पन्हाळा तालुक्यातील आणखी एक लगतचा घाटमार्ग ठरणाऱ्या काजिर्डा घाट मार्गाचे सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात असून त्यानंतर त्याचा डीपीआर शासनाला सादर केला जाणार आहे.
Chinder या कोकणातील गावात दर तीन वर्षांनी तीन दिवसांसाठी गाव पूर्णपणे रिकामे केले जाते. या काळात गाव भूत-प्रेत आणि आत्म्यांसाठी खुले असते, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.
रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची फवारणी युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाच-पाच वेळा फवारण्या पूर्ण केल्या आहेत.
सोशल मिडियात वावरत असलेल्या युगात गुहागरसारख्या तालुक्यात प्रसिद्ध शिमगोत्सवाच्या निमित्ताने काही गावकरी मंडळी आपल्या पिढीजात संकासूर नमनाची धार्मिक परंपरा जतन करतात.
मुंबई, ठाणे, पालघर या भागातून गावी दाखल होणाऱ्या कोकणवासियांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे एसटी प्रशासनाने आणखी जादा बसफेऱ्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
३० जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘देवखेळ’ वेबसिरीजमध्ये संकासुराला खुनी व क्रूर प्रवृत्तीचे पात्र दाखवण्यात आले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात ७० टक्के, तर दुसऱ्या टण्यात २० टक्के मोहोर आला. परंतु, हा सर्व मोहोर अति थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे.
आता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे. कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षापासून मोठा फटका बसत आहे.
मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा ३.४ अंशांनी अधिक होते. यंदाच्या हंगामातील तसेच फेब्रुवारी महिन्यातील आत्तापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले.