
'या' चुकांमुळे चहा होतो विषारी, जाणून घ्या चहा बनवण्याची योग्य पद्धत
चहा बनवण्याची सोपी पद्धत?
चहा जास्त वेळ उकळवून प्यायल्यास आरोग्याला पोहोचणारी हानी?
अतिप्रमाणात चहा पिण्याचे तोटे?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये असंख्य चहाप्रेमी आहेत. चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. अनेकांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा पिण्याची सवय असते. काहींना दुधाचा चहा पिण्याची सवय असते तर कधी ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी पिण्याची सवय असते. पण उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. उपाशी पोटी चहाचे सेवन केल्यामुळे ऍसिडिटी, पित्त, आंबट ढेकर इत्यादी पचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडते. चहामध्ये ‘टॅनिन’ नावाचा नैसर्गिक घटक आढळून येतो, जो आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे. चहा बनवताना त्यात चहा पावडर, साखर आणि दूध मिक्स करून चहा बराच वेळ उकळला जातो, यामुळे चहामधील अपचनीय रासायनिक संयुगे तयार होऊन चहाची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. चहामध्ये तयार झालेला विषारी घटक शरीर सहज पचन करत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चहा बनवताना केलेली कोणती चूक शरीरासाठी घातक ठरते? चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
चहा बनवताना त्यात दूध मिक्स केले जाते. त्यानंतर चहा बराच वेळ उकळवला जातो. चहाच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या टॅनिन असते तर दुधामध्ये प्रथिने आढळून येतात. हे दोन्ही घटक एकत्र मिक्स झाल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. टॅनिन आणि दुधातील प्रथिने एकत्र मिक्स झाल्यानंतर रासायनिक प्रक्रिया घडते. हे घटक पचनासाठी अतिशय कठीण असतात. अपचनीय घटक लिव्हरमध्ये गेल्यानंतर नैसर्गिक पचनक्रिया होत नाही, ज्यामुळे वारंवार मळमळ, उलट्या आणि अपचन होते. तसेच सतत गरम केलेला दुधाचा चहा प्यायल्यामुळे अपचन होऊन आरोग्य बिघडते.
वारंवार ऍसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून दूध आणि चहाचे पाणी एकत्र उकळू नये. दूध आणि चहा वेगवेगळे गरम करून नंतर एकत्र करून प्यावे. चहा बनवताना सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात चहा पावडर, साखर, आले किंवा वेलची घालून व्यवस्थित उकळवून घ्या. चहाला उकळी आल्यानंतर चहा कपात ओतून वरून त्यात गरम केलेले दूध ओतून चहा प्यावा. दोन घटक स्वतंत्रपणे गरम केल्यामुळे हानिकारक प्रक्रिया होत नाही. याशिवाय अशा पद्धतीने चहा प्यायल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही.
काहींना सकाळी उठल्यानंतर खूप कडक गरम केलेला चहा पिण्याची असते. चहाची पावडर गरम दुधात किंवा पाण्यत जास्त वेळ उकळवु नये. यामुळे टॅनिन आणि कॅफीनचे प्रमाण वाढून आरोग्य बिघडते. चहा सतत गरम करून प्यायमुळे पोटाच्या आतील थरांना हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे चहाचा अर्क कमी होऊन जातो . कमी वेळ उकळलेला चहा चवीला सौम्य लागतो पण आरोग्यासाठी कमी घातक ठरतो. त्यामुळे वारंवार गरम केलेला दुधाचा चहा पिऊ नये. या चहात विषारी घटक तयार होतात.
Ans: नाश्त्यानंतर किंवा दुपारी ३ ते ५ च्या दरम्यान चहा पिणे उत्तम मानले जाते, ज्यामुळे मूड सुधारतो आणि ऊर्जा मिळते.
Ans: चहावर लगेच पाणी प्यायल्याने दातांना कीड लागते किंवा आम्लपित्त (acidity) वाढते असे काही लोकांचे मत आहे, त्यामुळे तज्ज्ञ हे टाळण्याचा सल्ला देतात.
Ans: चहामुळे ऊर्जा मिळते, कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते आणि तणाव कमी होतो, तसेच ग्रीन टी चयापचय सुधारण्यास मदत करते.