
वारंवार शरीरात थकवा जाणवतोय? किडनी खराब झाल्यानंतर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
किडनी खराब होण्याची कारणे?
किडनीचे आजार कशामुळे होतात?
किडनी निकामी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायम सक्रिय असणे आवश्यक आहे. त्यातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासोबतच रक्त शुद्ध करते.पण सतत चुकीच्या गोळ्यांचे औषधांचे सेवन, मेडिकलमधील पेनकिलर, जीवनशैलीतील बदल, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. किडनीच्या कार्यात निर्माण झालेले अडथळे शरीरासाठी अतिशय घातक आहेत. सतत जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. किडनी खराब झाल्यानंतर रक्तशुद्ध होत नाही. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात.(फोटो सौजन्य – istock)
किडनी हा शरीरातील अतिमहत्वाच्या अवयव आहे. यामुळे रक्तात जमा झालेले घाणेरडे घटक बाहेर पडून जातात. इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण हेच अवयव खराब झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनी खराब झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. किडनी खराब झाल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास किडनी गंभीर आजारांची लागण होऊ शकते.
किडनी खराब झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थकवा, पाणी कमी पिण्यामुळे येणारा अशक्तपणा इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. हाय ब्लड प्रेशर, डायबेटीज, कौटुंबिक आजाराचा इतिहास, लठ्ठपणा, त्रासदायी औषधांचा अतिवापर, धूम्रपान आणि मद्यपान इत्यादी कारणांमुळे किडनीच्या आजारांची शरीराला लागण होते. याशिवाय बऱ्याचदा लघवीच्या सवयींमध्ये बदल जाणवणे, कमी जास्त प्रमाणात लघवी, लघवीत फेस तर काहीवेळा लघवीमध्ये रक्त पडणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करावेत. सतत हातपाय दुखणे, शरीराला सूज येणे, चेहऱ्यावर सूज येते इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
रक्तात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे शरीरात किडनीवर जास्तीचा तणाव येतो. किडनीमध्ये जमा झालेल्या विषारी घटकांमुळे सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, तसेच सकाळी डोळ्याभोवती सूज येणे इत्यादी गंभीर संकेत दिसू लागतात. याशिवाय काहींच्या शरीरात अचानक रक्तदाब वाढतो. वारंवार रक्तदाबाची समस्या उद्भवत असेल तर तातडीने योग्य त्या चाचण्या करून किडनीच्या आजारांचे निदान करावे. अचानक वाढलेला उच्च रक्तदाब सामान्य लक्षण नसून गंभीर आजाराचा संकेत आहे.
Ans: पाय, घोटे किंवा डोळ्यांच्या भोवती सूज येणे, अति थकवा आणि अशक्तपणा
Ans: अनियंत्रित साखरेमुळे किडनीचे नुकसान होते, दीर्घकाळ उच्च रक्तदाब किडनीच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो.
Ans: रक्तातील क्रिएटिनिनची पातळी मोजून किडनीचे कार्य तपासले जाते.