Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तराखंडमधील या ठिकाणाला म्हटले जाते भारतातील पहिले गाव, फक्त इथेच घडते सरस्वती नदीचे दर्शन

भारतातील पाहिले गाव कोणते आहे ते तुम्हाला माहिती आहे का? हे ठिकाण आपल्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी खूप लोकप्रिय आहे. असे म्हटले जाते की, इथे स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे .

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2025 | 08:35 AM
उत्तराखंडमधील या ठिकाणाला म्हटले जाते भारतातील पहिले गाव, फक्त इथेच घडते सरस्वती नदीचे दर्शन

उत्तराखंडमधील या ठिकाणाला म्हटले जाते भारतातील पहिले गाव, फक्त इथेच घडते सरस्वती नदीचे दर्शन

Follow Us
Close
Follow Us:

भारतात फिरण्यासाठीची अनेक ठिकाणे आहेत जी नेहमीच अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. देशात अनेक राज्ये वसले आहेत आणि प्रत्येक राज्याची आपली अशी काही खासियत आहे. असेच एक राज्य म्हणजे भारतातील उत्तराखंड! देवभूमी म्हणून या ठिकाणाची ओळख आहे. आपल्या धार्मिक महत्त्वासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी उत्तर प्रदेश नेहमीच फार चर्चेत असते. अशातच आज आम्ही तुम्हाला भारताच्या पहिल्या गावाबद्दल माहिती सांगणार आहोत जे उत्तर प्रदेशमध्ये वसले आहे.

5000 वर्षे जुनं ठिकाण, जिथे पांडवांनी केला होता निवास! भीमकुंडात स्नान करताच दूर होतात सर्व आजार

गावाचे नाव माणा गाव असे असून, ते केवळ आपल्या सुंदरतेसाठीच नाही तर आपल्या ऐतिहासिक महत्त्वासाठीही ओळखले जाते. कामाच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला या गावाची खासियत काय आहे ते जाणून घेऊया.

माणा गाव खास का आहे?

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात माणा गाव वसले आहे. हे गाव भारत-तिबेट सीमेजवळ आहे. बद्रीनाथ धामपासून हे ठिकाण फक्त ३ किलोमीटर अंतरावर आहे. इतिहास आणि संस्कृतीसाठी हे गाव म्हणजे एक खजिनाच आहे. या गावाची खासियत म्हणजे हे गाव भारतातील एकमेव असे गाव आहे जिथे सरस्वती नदीचे दर्शन घडते. यासोबतच, या ठिकाणाबद्दल असेही म्हटले जाते की हे गाव स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे.

माणा गावाला हे नाव कसे पडले?

या गावाचे नाव मणिभद्र देवाच्या नावावरून माणा ठेवण्यात आले आहे. पृथ्वीवरील हे एकमेव ठिकाण मानले जाते जे चार धामांपेक्षा पवित्र मानले जाते. हे गाव शाप आणि पापांपासून मुक्त मानले जाते. इतकेच नाही तर येथे अशीही एक श्रद्धा आहे की जेव्हा पांडव स्वर्गाकडे जात होते तेव्हा ते या गावातून गेले. येथे एक भीम पूल देखील आहे, ज्याबद्दल असे मानले जाते की भीमाने वाटेत धबधबा ओलांडण्यासाठी दगड फेकून पूल बनवला होता.

कैलास पर्वताचे 5 रहस्य जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील; का आजवर कुणीही यावर चढू शकलं नाही? 

माणा गाव म्हणजे सौंदर्याचे भांडार

धार्मिक आणि पौराणिक श्रद्धांव्यतिरिक्त, हे ठिकाण त्याच्या सौंदर्यासाठी देखील ओळखले जाते. हिमालयीन पर्वतांनी वेढलेले हे गाव त्याच्या नैसर्गिक सौंदर्याने भरलेले आहे. येथे तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणे आणि दृश्ये पाहता येतील. यामध्ये वसुंधरा धबधबा, व्यास गुहा, तप्त कुंड, सरस्वती नदी इत्यादींचा समावेश आहे.

Web Title: This place in uttarakhand is called as the first village in india only here you can see the saraswati river travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…
1

100 हून अधिक लोकांना गिळून बसलेय ही विहिर; आंघोळीला गेले अन् परतलेच नाही…

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
2

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
3

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात
4

कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.