Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्झायमर म्हणजे काय? गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला दिसून येतात ‘ही’ लक्षणे

अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेवर मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणे यामुळे मोठा फरक पडू शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 21, 2025 | 10:46 AM
अल्झायमर म्हणजे काय? गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरवातीला दिसून येतात 'ही' लक्षणे

अल्झायमर म्हणजे काय? गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरवातीला दिसून येतात 'ही' लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

प्रौढ व्यक्तींना थोड्या प्रमाणात स्मृतिभ्रंश होणे ही सामान्य बाब आहे, जसे की, चावी कुठे ठेवली न आठवणे, एखादे नाव लक्षात न राहणे, एखादी अपॉइंटमेंट विसरणे इत्यादी. पण असे गोंधळ आणि स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे रोजच्या कामांमध्ये व्यत्यय येऊ लागतो तेव्हा ही एखाद्या वाईटाची सूचना असू शकते – अल्झायमर आजार. वयामुळे होणारे सामान्य विस्मरण आणि अल्झायमरच्या सुरुवातीच्या चेतावणीच्या लक्षणांमधील फरक समजून येणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्यामुळे गंभीर परिस्थिती ओळखता येते आणि संबंधित व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या देखभालीची पातळी आणि त्या व्यक्तीची एकंदरीत जीवन गुणवत्ता यामध्ये अनुकूल बदल घडवून आणता येतो. याबद्दल डॉ यतीन सागवेकर, कन्सल्टन्ट, न्यूरॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

समस्येची सर्वात सामान्य, सुरुवातीची चिन्हे:

अल्झायमर हा आजार कालांतराने वाढतो आणि मेंदूमधील बिघाडाशी संबंधित असतो. हळूहळू व्यक्तीची स्मृती, चिकित्सक विचार प्रक्रिया आणि शेवटी वर्तनावर याचे नकारात्मक परिणाम होऊ लागतात. या आजाराची सुरुवातीची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत. दैनंदिन कामे लक्षात न राहणे, हे सर्वात सामान्य लक्षण आहे. वाडवडिलांची, नातवंडांची नावे आठवावी लागणे किंवा वारंवार तेच-तेच बोलणे, प्रश्न विचारणे, लक्षात न राहणे आणि दररोजच्या कृती लक्षात ठेवण्यासाठी ऑटोमेटेड क्यूजवर अवलंबून राहणे.

कामे पूर्ण करण्यात अडचणी:

जेवण बनवणे, एखाद्या गोष्टीसाठी पैसे देणे आणि ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहोचणे यासारखी साधी कामे पूर्ण करण्यात अडचणी येणे हा आजाराचा सुरुवातीचा टप्पा असू शकतो. समाजाच्या मूलभूत रचनांचा समावेश: चर्चा समजून न घेता येणे, संभाषणाचा धागा गमावणे किंवा विविध सोप्या कृती लक्षात न राहणे.

ठिकाण आणि वेळेचा गोंधळ:

अशा व्यक्ती आपण कुठे आहोत, हे पूर्णपणे विसरू शकतात, त्या अक्षरशः जुन्या काळात जगू शकतात, त्यांना वाटते की ते जुन्या घरात आणि शहरात राहत आहेत. आजार खूप पुढच्या टप्प्यात गेल्यावर त्यांना इतर काहीही पटवून देणे देखील कठीण होते.

आजाराचे निदान लवकरात लवकर होणे का महत्त्वाचे आहे. ज्यांना अल्झायमर होतो अशा बहुतांश व्यक्तींचे कुटुंबीय “उतारवयामुळे” असे ठरवून लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच अल्झायमर हा आजार खूप उशिरा दिसून येतो. लक्षणे लवकरात लवकर ओळखू यावीत यासाठी:अधिक प्रभावी हस्तक्षेप: अल्झायमर आजार बरा होऊ शकत नाही, परंतु औषधे घेतल्यास, तब्येतीत होणाऱ्या घसरणीचा वेग कमी होऊ शकतो. आजार समजून येणे ही प्रभावी उपचारांची गुरुकिल्ली आहे, त्यामुळे संबंधित प्रत्येकालाच मनःशांती मिळू शकते.

सुनियोजन:

आजाराचे लवकरात लवकर निदान झाल्यास उपचारांचे, देखभालीचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येते.लक्षणांचे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या व्यवस्थापन: अल्झायमरच्या रुग्णांना योग्य आधार मिळाला तर त्यांची दिनचर्या आणि रोजच्या कृतींचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रभावी धोरणे ठरवता येऊ शकतात. अधिक उपचार पर्याय: अल्झायमरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील रुग्णांना अभ्यास आणि उपचार चाचण्यांमध्ये सहभागी करून घेतले जाण्याची शक्यता जास्त असते.

वैद्यकीय मदत कधी घ्यावी:

वर्तणुकीशी संबंधित अडचणी, स्मृती कमी होण्याची लक्षणे वाढू लागल्यास आणि कालांतराने ती आणखी बिघडू लागल्यास न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मेंदूच्या स्कॅन व्यतिरिक्त, वैद्यकीय इतिहास आणि स्मृती आणि मज्जासंस्थेच्या चाचण्या आवश्यक आहेत. अल्झायमर आजारासारख्याच असलेल्या, इतर उपचार करण्यायोग्य परिस्थितींना वेगळे करणे देखील महत्वाचे आहे. जसे की व्हिटॅमिनची कमतरता किंवा खनिजांची कमतरता, थायरॉईड विकार, नैराश्यामुळे होणारा स्मृतिभ्रंश.

प्रियजनांना आधार देणे:

अल्झायमर रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देणे अत्यंत महत्वाचे आहे. अल्झायमर सपोर्ट ऑर्गनायझेशन्स अनेक आहेत. या संसाधनांव्यतिरिक्त, कुटुंबे आरोग्य सेवा प्रदाते, समर्थन गट तसेच नियोजनाच्या कठीण पैलूंना तोंड देण्यास मदत करू शकणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची मदत घेऊ शकतात. विसरणे हा बहुतेकदा वृद्धत्वाचा एक निरुपद्रवी भाग असतो, परंतु जेव्हा त्यामुळे दैनंदिन कामकाजात व्यत्यय येऊ लागतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नये. अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेवर मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणे यामुळे मोठा फरक पडू शकतो. जागरूकता, समज आणि सक्रिय देखभाल व्यक्ती आणि कुटुंबांना सन्मानाने आणि आशेने पुढे जाण्याची शक्ती देऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: What is alzheimers these symptoms appear initially after contracting a serious illness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • brain
  • Doctor advice
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ‘हे’ पाणी ठरेल प्रभावी, शरीर होईल डिटॉक्स
1

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ‘हे’ पाणी ठरेल प्रभावी, शरीर होईल डिटॉक्स

शेवटी आपलेही अनोळखी होतात! ‘अल्झायमर’… सैय्यारा चित्रपटातील ‘हा’ आजार, नक्की आहे तरी काय?
2

शेवटी आपलेही अनोळखी होतात! ‘अल्झायमर’… सैय्यारा चित्रपटातील ‘हा’ आजार, नक्की आहे तरी काय?

तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी ठरेल संजीवनी! आरोग्यासंबंधित ‘या’ आजारांपासून मिळेल कायमची सुटका, सद्गुरू सांगितलेला उपाय
3

तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी ठरेल संजीवनी! आरोग्यासंबंधित ‘या’ आजारांपासून मिळेल कायमची सुटका, सद्गुरू सांगितलेला उपाय

रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पिवळ्या फुलांचा चहा ठरेल प्रभावी, त्वचा राहील कायमच सुंदर
4

रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पिवळ्या फुलांचा चहा ठरेल प्रभावी, त्वचा राहील कायमच सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.