Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाखो वर्षांपासून भारतीय लोक हाताने का जेवतात? जाणून घ्या शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे

अन्नपदार्थांचे सेवन हाताने केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. बोटांमधील स्नायू मेंदूमध्ये जोडलेले असतात. ज्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. जाणून घ्या हाताने जेवल्यामुळे शरीराला होणारे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 31, 2025 | 08:41 AM
लाखो वर्षांपासून भारतीय लोक हाताने का जेवतात?

लाखो वर्षांपासून भारतीय लोक हाताने का जेवतात?

Follow Us
Close
Follow Us:

मागील अनेक वर्षांपासून चालत्या आलेल्या परंपरा अजूनही आवडीने फॉलो केल्या जात आहेत. ताटात वाढलेले जेवण जेवण्यासाठी अनेक लोक चमचा, काटा किंवा सुरीचा अतिशय सहजपणे वापर करतात. पण भारतीय लोक जेवण कायमच हाताने जेवतात. ताटात कोणताही पदार्थ वाढल्यानंतर तो हातानेच खाल्ला जातो. हल्लीच्या आधुनिक जगात भारतमध्ये हाताने जेवण्याची परंपरा कायम टिकून आहे. हाताने जेवण्याची सवय केवळ घरातच नाहीतर इतर ठिकाणी बाहेर फिरायला गेल्यानंतर सुद्धा हातानेच अन्नपदार्थ खाल्ले जातात. अन्नपदार्थ हाताने जेवल्यामुळे आरोग्य, संस्कृती, मानसिक समाधान आणि सामाजिक बंध टिकून राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हाताने जेवल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

सावधान! लिव्हरमध्ये अनावश्यक चरबी वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे, दुर्लक्ष केल्यास ओढवेल मृत्यू

हाताने जेवण्याचे फायदे:

मानवी शरीरात असंख्य स्नायू आणि हाडे असतात. हातांच्या बोटांमधील स्नायू मेंदूला जोडलेले असतात. हाताने अन्नपदार्थांना स्पर्श केल्यानंतर त्या संवेदना मेंदूपर्यंत थेट पोहचतात. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते. हातांमधील उब आणि हलक्या दाबामुळे अन्नातील रसास्रव होण्यास मदत होते. ज्यामुळे शरीर जेवलेले अन्नपदार्थ सहज तोडून घेते. या प्रक्रियेमुळे शरीराला खाल्ले अन्नपदार्थ सहज शोषून घेण्यास मदत होते. पचनक्रियेमध्ये कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत.

लाखो वर्षांपासून भारतीय लोक हाताने का जेवतात?

किती प्रमाणात अन्न खावे:

बऱ्याचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक लोक चमच्याने जेवतात. यामुळे शरीराला किती अन्नाची आवश्यकता आहे, हे बऱ्याचदा समजून येत नाही. त्यामुळे कायमच हाताने जेवण जेवावे. तसेच आहारात अतितिखट, तेलकट किंवा भरपूर प्रमाणात अन्नपदार्थ खाणे टाळावे. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. आहारतज्ञांच्या मते, कायमच निरोगी राहण्यासाठी हाताने अन्नपदार्थ खावेत.

शरीरात निर्माण झालेली ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, थकवा होईल दूर

काहींना हाताने अन्नपदार्थ खाताना अस्वच्छता वाटू लागते. त्यामुळे जेवणाआधी कायमच हात स्वच्छ धुवणे अतिशय महत्वाचे आहे. जेवणाच्या ताटावर बसण्याआधी हँडवॉश किंवा घरातील कोणत्याही साबणे हात धुवावे. पूर्वीच्या काळी अनेक घरांमध्ये हात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाची पाने आणि राखचा वापर केला जात होता.

FAQs (संबंधित प्रश्न)

हाताने जेवण का जेवावे?

हाताने जेवण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे पचन सुधारते, अन्न नीट चघळले जाते आणि खाण्याची जाणीव वाढते. तसेच, हाताच्या बोटांच्या ऍक्युप्रेशरमुळे रक्ताभिसरण सुधारते.

हाताने जेवण्याचे फायदे:

आयुर्वेदानुसार, आपल्या हाताच्या बोटांमध्ये पाच तत्वे (अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल) असतात, ज्यामुळे अन्न पचनास मदत होते. हाताने जेवताना आपण अन्नाची चव, पोत आणि सुगंधावर अधिक लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे खाण्याची जाणीव वाढते आणि जास्त खाणे टाळता येते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Why indians have been eating with their hands for millions of years know the amazing benefits for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • health
  • Health Care Tips
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? जाणून घ्या वारंवार लघवीला होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय
1

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? जाणून घ्या वारंवार लघवीला होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यासंबंधित १०० टक्के वाढतात ‘हे’ गंभीर आजार, लठ्ठपणा- मधुमेहामुळे होईल शरीराचे नुकसान
2

जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यासंबंधित १०० टक्के वाढतात ‘हे’ गंभीर आजार, लठ्ठपणा- मधुमेहामुळे होईल शरीराचे नुकसान

Drying Clothes Indoors: तुम्हीही बेडरूममध्ये ओले कपडे वाळवता का? मग वेळीच सावध व्हा, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार
3

Drying Clothes Indoors: तुम्हीही बेडरूममध्ये ओले कपडे वाळवता का? मग वेळीच सावध व्हा, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

आठवड्यातून किती वेळा चिकन खाऊ शकता? वेळीच सावध व्हा अन्यथा…, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
4

आठवड्यातून किती वेळा चिकन खाऊ शकता? वेळीच सावध व्हा अन्यथा…, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.