Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरातल्या लोकांच्या मृत्यूनंतर का वाचावं गरुड पुराण? काय आहे यामागची श्रद्धा? घ्या जाणून…

गरुड पुराण हे हिंदू धर्माच्या 16 पुराणांपैकी एक पुराण आहे. गरुड पुराणात (Garud Puran) मृत्यूनंतरच्या प्रवासाचं तपशीलवार वर्णन भगवान विष्णूंनी केलं असल्याची श्रद्धा आहे. घरात कुणाचा मृत्यू झाला तर गरुड पुराणाचे पठण केले जाते. हिंदू धर्मानुसार, अंतिम संस्कारासह 13 दिवस अनेक विधी केले जातात. त्या 13 दिवसांत गरुड पुराणाचा विधीही करण्यात येतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2023 | 02:57 PM
घरातल्या लोकांच्या मृत्यूनंतर का वाचावं गरुड पुराण? काय आहे यामागची श्रद्धा? घ्या जाणून…
Follow Us
Follow Us:

मुंबई : गरुड पुराण हे हिंदू धर्माच्या 16 पुराणांपैकी एक पुराण आहे. गरुड पुराणात (Garud Puran) मृत्यूनंतरच्या प्रवासाचं तपशीलवार वर्णन भगवान विष्णूंनी केलं असल्याची श्रद्धा आहे. घरात कुणाचा मृत्यू झाला तर गरुड पुराणाचे पठण केले जाते. हिंदू धर्मानुसार, अंतिम संस्कारासह 13 दिवस अनेक विधी केले जातात. त्या 13 दिवसांत गरुड पुराणाचा विधीही करण्यात येतो.

मृत व्यक्तीचा आत्मा हा 13 दिवस घरात असतो आणि तो आत्माही या दिवसाांत गरुड पुराण नातेवाईकांसोबत ऐकतो, अशी श्रद्धा आहे. आत्म्याला संसारिक आसक्ती सोडणं आणि मोक्ष मिळवण्यासाठी गरुड पुराणाचं वाचन लाभदायी ठरतं अशी मान्यता आहे. गरुड पुराणात यासह अनेक महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आलेल्या आहेत. ज्यांचं पालन केल्यानं जीवन सोपं, साधं आणि यशस्वी होतं, अशी मान्यता आहे.

गरुड पुराण नेमकं काय आहे?

गरुड पुराण हा वैष्णव पंथांशी संबंधित धर्मग्रंथ आहे. पक्षांचा राजा आणि भगवान विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडानं परमेश्वराला मृत्यू, यमलोक यात्रा, नरक, मोक्ष याबाबत अनेक गूढ प्रश्न विचारले होते, विष्णूंनी या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली आहेत. प्रश्नोत्तरांच्या या मालिकेला गरुड पुराण असं म्हणतात. यात स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, पुनर्जन्म इत्यांदीविषयी ज्ञान, विज्ञान, आचार, नियम, धर्म याबाबतच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एककीडं मृत्यूचं रहस्य सांगतानाच, गरुड पुराणात यशस्वी जगण्याचं रहस्यही सांगितलेलं आहे. या पठणानं मृत्यूपूर्वीची आणि नंतरची स्थिती समजते. यातून मनुष्य चांगले पुण्यकर्म करतो, अशी श्रद्धा आहे.

मृत्यू झालेल्या घरात करतात गरुड पुराणाचं पठण…

मृत्यू झाल्यानंतर आत्मा हा १३ दिवस घरात कुटुंबीयांसोबत असतो, अशी धारणा आहे. अशा काळात हे पठण केल्यानं आत्म्याला स्वर्ग, नरक, गती, सद्गती, दु:ख, याचा अर्थ कळतो. मृत व्यक्ती त्याच्या कर्मानं आता पुढच्या कोणत्या वाटेला जाईल आणि कोणत्या जगात जाईल, याची माहिती त्या आत्म्याला कळते. तर घरातील नातेवाईकही हे गपुड पुराम ऐकत असल्यानं पाप आणि पुण्य याबाबतच्या त्यांच्या धारणाही पक्क्या होतात. आयुष्यात चांगल्या कृती कराव्यात, असा संदेश या पुराणाच्या पठणातून मिळतो.

Web Title: Why read garuda purana after death what is faith behind get to know nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2023 | 12:45 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.