Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना १२ तास वीज, पाच वर्षांत दरवर्षी वीज बिल कमी होणार : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

शेतकऱ्यांना दिवसात १२ तास वीज देण्याचे आश्वासन दिले होते. लवकरच राज्याच्या ८० टक्के भागातील शेतकऱ्यांना दिवसभर १२ तास वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2025 | 08:22 AM
LIGHT (फोटो सौजन्य- PINTEREST)

LIGHT (फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा: शेतकऱ्यांना दिवसात १२ तास वीज देण्याचे आश्वासन दिले होते. लवकरच राज्याच्या ८० टक्के भागातील शेतकऱ्यांना दिवसभर १२ तास वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय केंद्र सरकारच्या सूर्य घर योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला ३०० युनिटपर्यंत वीज मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ७२० कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. राज्यात विजेचे बिल दरपाच वर्षांनी कमी करून दाखवू, असे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. लोअर वर्धा प्रकल्पावर पाचशे मेगावॉट विजनिर्मितीचा प्रकल्प उभा राहतो आहे. त्यामुळे वर्धा जिल्हा विजेच्या व सौरऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. आर्वी तालुक्यातील नेरी (मिर्झापूर) या गावाने सूर्य घर योजनेचा लाभ घेत सर्व घरांवर सौरप्लेट उभारल्या आहेत. त्यामुळे हे गाव संपूर्ण सौर ऊर्जा असलेले सौरग्राम झाले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

विदर्भ होईल सुजलाम् सुफलाम् वैनगंगा-नळगंगा हा प्रकल्प विदर्भाची
सुजलाम सुफलाम करणारा आहे. १ लाख कोटींचा निधी खर्च करून पूर्णत्वास जाणाऱ्या या प्रकल्पाचा अंतिम आराखडा सध्या तयार केला जात आहे. १० जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून ५५० किमीची नदी तयार केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे ६५ टीएमसी पाणी विदर्भाला मिळणार असून, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची समस्या निकाली निघणार आहे. कोरडवाहू शेतजमीन सिंचनाखाली येणार असून, याचा लाभ वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील इतर जिल्ह्यांनाही होणार आहे. विहिर पुनर्भरण कार्यक्रमही वेगाने राबविला जात आहे, असेही फडणवीस म्हणाले.

७ लाख कोटींची गुंतवणूक
राज्यातील विकासाचे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील शिवाय रोजगार निर्मिती व विदर्भात उद्योग आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. दोओस येथील परिषदेच्या माध्यमातून विदर्भात सुमारे ७ लाख कोटी रुपयांची गुंवतणूक येणार आहे. गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्याचे विकासचित्र बदलणार आहे. विदर्भाच्या इतरही भागांत उद्योग येणार आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
रस्त्यांचे जाळे विणणार विदर्भात लोकप्रतिनिधी मागणी करतील तेथे रस्ते तयार केले जात आहेत. सध्या तरी विकासासाठी आवश्यक रस्ते तयार होत असून भविष्यातील गरजांनुसार रस्ते विकासाचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

समृद्धी महामार्गाने विकासाला चालना मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे वर्धा जिल्ह्यात विकासाला नवी गती मिळाली आहे. भविष्यात वर्ध्यापासून सुरू होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे आणि सिंदीच्या कोरड्या बंदरामुळे हा जिल्हा मध्य भारतातील लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येईल. समृद्धीच्या विरुल नोडला लवकरच सरकारकडून मिळेल. यामुळे उद्योगांसाठी एक परिसंस्था निर्माण मान्यता होईल व स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. गडचिरोली जिल्हा स्टील हब म्हणून उदयास येत आहे. येणाऱ्या काळात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर येथील लोहखनिजावर आधारित उद्योगांसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.

 

Web Title: 12 hours of electricity for farmers electricity bill will be reduced every year in five years chief ministers assurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 08:22 AM

Topics:  

  • devendra fadanvis
  • farmer
  • Light Bill

संबंधित बातम्या

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
1

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासन मदत, ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता
2

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासन मदत, ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut
3

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut

शेतकऱ्यांना मध्यस्थांपासून मिळणार दिलासा, १३३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लागू केली जाईल ‘ई-नाम’ योजना
4

शेतकऱ्यांना मध्यस्थांपासून मिळणार दिलासा, १३३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लागू केली जाईल ‘ई-नाम’ योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.