Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ

Ayushman Bharat Yojana: ग्रामीण, आदिवासी आणि शहरी गरीब भागात आयुष्मान कार्डमुळे कॅशलेस उपचारांची उपलब्धता वाढली असून वैयक्तिक आरोग्य खर्चात लक्षणीय घट झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 01, 2026 | 04:34 PM
आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड (photo Credit- X)

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • राज्यात ३७ टक्के आयुष्मान कार्डची निर्मिती झाली पूर्ण
  • ६३ टक्के लाभार्थी अद्याप कव्हरेजच्या प्रतीक्षेत
  • मानधनातही वाढ
Ayushman Bharat Yojana Marathi News: राज्यात राबवण्यात येणाऱ्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत एकूण ९ कोटी ३० लाख आयुष्मान कार्ड तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी ४४ लाख कार्डाची निर्मिती पूर्ण झाली आहे. यानुसार राज्यात सध्या सुमारे ३७ टक्के उद्दिष्ट साध्य झाले असून उर्वरित ६३ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

योजनेचे फायदे आणि व्याप्ती

या योजनेंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा देण्यात येते. हृदयविकार, कर्करोग, किडनी विकार, अपघात उपचारांसह हजारहून अधिक उपचार पॅकेजेसचा समावेश असल्यामुळे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या कार्डधारकांची संख्या एकूण पात्र लोकसंख्येच्या एक तृतीयांशाहून अधिक असल्याचे चित्र आहे.

हे देखील वाचा: Ayushman Bharat Yojana: आजारी पडला तर घर विकावे लागणार नाही..; आयुष्मान भारत योजना कशी मिळवायची? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

विशेषतः ग्रामीण, आदिवासी आणि शहरी गरीब भागात आयुष्मान कार्डमुळे कॅशलेस उपचारांची उपलब्धता वाढली असून वैयक्तिक आरोग्य खर्चात लक्षणीय घट झाली आहे. सरकारी रुग्णालयांसह मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्येही या कार्डच्या आधारे उपचार शक्य होत असल्याने नागरिकांचा सहभाग वाढत आहे.

१०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्यास असमानता होणार कमी

राज्यातील आयुष्मान कार्ड निर्मितीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्यास आरोग्य सेवांतील असमानता कमी होऊन सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व परवडणारी उपचार व्यवस्था उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

हे देखील वाचा: Ayushman Bharat Mahatma Phule Scheme: दर्जेदार उपचार! आयुष्मान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्रित; आरोग्यसेवेची गुणवत्ता सुधारली

पात्र लाभार्थ्यांपर्यंत सर्व आरोग्य योजना विशेष नोंदणी मोहिमा, आरोग्य शिबिरे, ग्रामपंचायत स्तरावरील कार्ड निर्मिती, तसेच शहरी भागात मोबाईल युनिट्सद्वारे नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी म्हटले आहे.

नवीन मानधनाचे दर असे…

है कार्ड तयार करताना प्रत्येक केवायसीसाठी ५ रुपये दिले जात. आता दर वाढवून २० रुपये दिले जात आहेत, तर कार्ड वितरणासाठी ३ रुपयावरून १० रुपये दर करण्यात आला आहे. असे यात एकूण मानधन आता ३० रुपये करण्यात आला आहे.

Web Title: 344 million citizens in the state have received ayushman cards honorarium has also been increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Ayushman Bharat Yojana
  • Maharashtra Health Department
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?
1

Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया
2

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…
4

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.