Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: कडाक्याच्या थंडीमुळे गव्हाला सोनेरी बहर! शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण

अहिल्यानगर जिल्ह्यात वाढलेल्या थंडीमुळे गहू पिकाला चांगला लाभ होताना दिसत आहे. तसेच, बाजारपेठेतही यंदा गव्हाला चांगला भाव मिळत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 26, 2025 | 08:21 PM
निर्यात बंदी हटवली, गव्हाचे भाव वाढणार

निर्यात बंदी हटवली, गव्हाचे भाव वाढणार

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगरमध्ये गुलाबी थंडी
  • कडाक्याच्या थंडीमुळे गहू पीक बहरले
  • बाजारातही गव्हाला चांगला भाव
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा गहू पिकाला मोठा फायदा होत असून शेतशिवारात सध्या गव्हाची जोमदार आणि उत्साहवर्धक वाढ दिसून येत आहे. दरवर्षी डिसेंबर–जानेवारी महिन्यातील थंडी गहू पिकासाठी पोषक मानली जाते आणि यंदा तापमानातील लक्षणीय घसरण गहू उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल ठरत असल्याचे चित्र आहे.

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सकाळ आणि संध्याकाळी वाढलेली थंडी जाणवत असून, त्यामुळे गहू पिकाची पाने गडद हिरवी, तजेलदार आणि सशक्त दिसत आहेत. दिवसा मध्यम तापमान आणि रात्री नीचांकी तापमान अशी हवामानस्थिती गहू पिकाच्या वाढीसाठी आदर्श असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. या वातावरणामुळे मुळांची वाढ चांगली होत असून फुटवे जोमाने फुटत आहेत. परिणामी पिकाची घनता वाढून उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये यंदाच्या रब्बी हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये विशेष आशावाद पाहायला मिळत आहे.

Ahilyanagar News: शनिशिंगणापूर देवस्थानचा आर्थिक कारभार संशयाच्या भोवऱ्यात! 14 जानेवारीला सुनावणी

सिंचन व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन

हवामानातील संभाव्य अनिश्चिततेचा विचार करता शेतकऱ्यांनी सिंचन व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. दवाचा विपरीत परिणाम टाळण्यासाठी सकाळी लवकर सिंचन न करता दुपारी किंवा संध्याकाळी हलके सिंचन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पानांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नियमित पाहणी करून गरज भासल्यास संरक्षणात्मक फवारणी करावी, असे मार्गदर्शन प्रादेशिक कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यास होणार मदत

शेतकऱ्यांनी सांगितले की, “यंदा थंडी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आली आहे. पिकाची वाढ अत्यंत समाधानकारक असून पानांना चांगला तजेला आला आहे. आतापर्यंत रोगराईचे प्रमाणही कमी आहे. जर असेच हवामान कायम राहिले, तर यंदा गव्हाचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत निश्चितच अधिक येईल.”

Hingoli Politics : ३० वर्षांनंतर हिंगोली न.प. वर शिवसेनेचा झेंडा; रेखा श्रीराम बांगर यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार

थंडीमुळे गव्हामध्ये दाणे भरण्याच्या टप्प्यातही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असून उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. गव्हाच्या कणसांची योग्य वाढ होण्यासाठी थंड व कोरडे वातावरण अत्यंत उपयुक्त ठरते. यंदाच्या हवामानामुळे हा काळ गहू पिकासाठी पोषक ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे.

संक्रांतीपर्यंत थंडी टिकण्याची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे थंड वातावरण मकर संक्रांतीपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गहू पिकाची वाढ याच गतीने सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामानाने साथ दिल्यास जिल्ह्यातील गहू उत्पादनात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत. पिकाचा सध्याचा जोम पाहता यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Ahilyanagar farmers are happy beacause of wheat crops benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 08:21 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Wheat Prices

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.