Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज

पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.यानंतर राज्य सरकारकडून मदतीची घोषणा झाली असून देखील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 16, 2025 | 08:04 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • अतिवृष्टी झाली, मात्र मदत अजून पोहचली नाही
  • राज्य सरकारवर शेतकरी नाराज
  • चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत
पाथर्डी तालुक्यात यंदाच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. पाण्याखाली गेलेली शेती, वाहून गेलेली जमीन आणि उद्ध्वस्त झालेली पिके यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची घोषणा केली होती. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यात दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे सरसकट शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असेही सांगितले होते.

मात्र, दिवाळी संपून दीड महिना उलटला असतानाही शेकडो शेतकऱ्यांना अद्याप एकाही रुपयाची मदत मिळालेली नाही.

Ahilyanagar News: गावातील निवडणुकीसाठी ‘या’ निष्ठावंत नेत्याने शिवबंधनाची गाठ सोडलीच! उद्धव ठाकरेंना पाठवला राजीनामा

अनेक गावांतील पिकांचे मोठे नुकसान

मिरी, करंजी, तिसगाव, चिचोंडी, शिराळ, कोल्हार, धारवाडी, गितेवाडी, डमाळवाडी, डोंगरवाडी, लोहसर, खांडगाव, भोसे अशा अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसला. मका, तूर, उडीद, कांदा, सोयाबीन, कपाशी, बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले असून फळबागा आणि फुलशेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनीच वाहून गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.

महसूल विभागाने पंचनामे करून माहिती शासनाकडे पाठविल्याचे सांगितले जात असले तरी निधी मिळण्याचा वेग अत्यंत मंद आहे.

निधी वितरणात विलंब, शेतकरी संतप्त

शासनाकडून निधी वितरणाचा वेग मंद असल्याने शेतकरी तहसील कार्यालये आणि बँकांच्या उंबरठ्यावर हेलपाटे घालत आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. कर्जफेड, बियाण्यांची व्यवस्था, रब्बी पेरणी – काहीच हातात पैसा नसल्याने कठीण झाले आहे.

Jalna News : पहिल्या वारकरी साहित्य संमेलनचा मुहूर्त ठरला! संमेलनाध्यक्षपदी डॉ. सतीश बडवे यांची निवड

सरकारने घोषणा केली, पण प्रत्यक्षात पैसा मिळत नाही

काही शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती अपूर्ण असल्याने किंवा तांत्रिक त्रुटींमुळे निधी अडकल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. मात्र, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.

शासनाविरोधात रोष वाढला

कृषिमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. पण दिवाळीला महिना उलटूनही शेतकरी वंचित असल्याने ग्रामस्थ आणि शेतकरीवर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “आम्हाला आश्वासने नकोत, प्रत्यक्षात मदत हवी.” पाथर्डी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत.

Web Title: Ahilyanagar news farmers from pathardi are waiting for compensation due to heavy rain in farms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 08:04 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार
1

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध
2

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
3

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
4

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.