Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyangar News: जिल्ह्यात माविआचा घोळ अजूनही मिटला नाही, मित्रपक्षच असतील एकमेकांच्या विरोधात?

नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर होऊन 4 दिवस उलटले. मात्र, अजूनही महायुती आणि माविआ एकत्र लढणार का? याचे उत्तर मिळाले नाही.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 09, 2025 | 05:02 PM
Ahilyangar News: जिल्ह्यात माविआचा घोळ अजूनही मिटला नाही

Ahilyangar News: जिल्ह्यात माविआचा घोळ अजूनही मिटला नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर होऊन 4 दिवस उलटले
  • मात्र, अजूनही नगर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ठरलेले नाही
  • त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे
अहिल्यानगरमधील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर होऊन चार दिवस उलटले, तर दोन दिवसांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये उमेदवार तर ठरलेले नाहीतच, पण एकत्र लढायचे की स्वतंत्रपणे, यावरही अद्याप निर्णय झालेला नाही. स्वबळाचा नारा दिला जात असताना नेतेमंडळी मित्रपक्षांसोबत बैठकाही घेत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून ‘सब गोलमाल है’ अशी अवस्था आहे.

नगर जिल्ह्यातील १२ नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये यंदा निवडणुका होणार आहेत. अनेक ठिकाणी प्रथमच नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड होणार असून काही ठिकाणी ही संधी अनेक वर्षांनी मिळत आहे. दोन्ही गटांमध्ये तीव्र रस्सीखेच असल्याने नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित करताना सावध पावले उचलली जात आहेत. बंडखोरीच्या संकेतांमुळे राज्यस्तरावरून समन्वयाची प्रयत्न पुढील आठवड्यात सुरू होतील, अशी माहिती आहे. श्रीरामपूर, श्रीगोंदे आणि पाथर्डी येथे महायुती किंवा महाविकास आघाडी कितपत टिकेल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Satara News : महावितरणविरोधात शेतकरी आक्रमक; प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास…, आंदोलकांनी दिला गंभीर इशारा

मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात

श्रीरामपूरात भाजपाचे माजी नेते प्रकाश चिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना नगराध्यक्षपदासाठी पुढे केले जात असल्याचे बोलले जात असले तरी अंतर्गत स्पर्धा तीव्र आहे. चिते यांनी प्रवेशानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खुलेपणाने टीका सुरू केली असून महायुतीची शक्यता अत्यंत क्षीण झाल्याचे बोलले जाते. श्रीगोंद्यात पाचपुते विरोधक नेते एकाच पक्षात (अजित पवार गट) जमा झाले आहेत. मात्र या गटातही एकमत नाही. पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांना भाजपातील आणि मित्रपक्षातील विरोध कायम असून महायुतीला येथेही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

संगमनेरमध्ये चुरशीचा सामना

अलीकडील विधानसभा पराभवानंतर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात अत्यंत सावधपणे धोरण आखत आहेत. त्यांच्या समर्थकांमध्येही पराभवाचा बदला घेण्याची भावना तीव्र आहे. दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांना मंत्री विखे पाटलांचा मजबूत पाठींबा असून ते देखील सज्ज आहेत. त्यामुळे संगमनेर नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Devndra Fadnavis News: मंत्र्यांच्या बंगल्यांवर अनावश्यक खर्च; रोहित पवारांच्या आरोपांनंतर फडणवीसांचे अधिकाऱ्यांना आदेश

कोपरगावात महायुतीत फूट? बंडखोरीची शक्यता वाढली

कोपरगाव हे मोठे नगरपालिका क्षेत्र असून येथे आमदार आशुतोष काळे (राष्ट्रवादी) विरुद्ध माजी आ. स्नेहलता कोल्हे (भाजपा) असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीची ताटातूट जवळपास निश्चित मानली जात आहे. दरम्यान, भाजपाचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे पुन्हा सक्रिय झाले असून ते कोल्हे विरोधी गटातील मानले जातात. कोल्हे स्वतःचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी देण्यावर ठाम राहतील, त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे पुन्हा भाजपात बंडखोरी उद्भवेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Ahilyangar news mahayuti and mavia candidate not decided for nagarpanchayat and nagarparishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ahilyanagar politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Price Hike: प्रत्येक सिलेंडरवर 380 रुपयांचा तोटा, तरीही सरकारने वाढवल्या नाहीत किमती; पण का? ‘हे’ आहे कारण…
1

LPG Price Hike: प्रत्येक सिलेंडरवर 380 रुपयांचा तोटा, तरीही सरकारने वाढवल्या नाहीत किमती; पण का? ‘हे’ आहे कारण…

सरकारचा मोठा निर्णय! रेशन दुकानांवर पुन्हा मिळणार रॉकेल; ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यांना मिळाली मंजुरी?
2

सरकारचा मोठा निर्णय! रेशन दुकानांवर पुन्हा मिळणार रॉकेल; ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यांना मिळाली मंजुरी?

Free Finance Apps: 1 एप्रिलपासून तुमचं Finance Planning करा आणखी मजबूत, ‘हे’ मोफत ॲप्स तुम्हाला करतील बचतीसाठी मदत
3

Free Finance Apps: 1 एप्रिलपासून तुमचं Finance Planning करा आणखी मजबूत, ‘हे’ मोफत ॲप्स तुम्हाला करतील बचतीसाठी मदत

Ratnagiri News :  आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त
4

Ratnagiri News : आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.