Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंचा आरोप

या अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

  • By साधना
Updated On: Mar 09, 2023 | 05:20 PM
अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget) सभागृहात सादर करण्यात आला आहे. दरम्यान यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

अर्थसंकल्पाबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, महाविकास आघाडीची जी पंचसूत्री होती त्याचेच नाव बदलून पंचामृत ठेवण्यात आलं आहे. कुठेही शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला नाही. ज्या योजना अजित पवार मुख्यमंत्री असताना जाहीर करण्यात आल्या होत्या, त्याच घोषणा पुन्हा करण्यात आल्या आहे. या अर्थसंकल्पातून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला असल्याचं दानवे म्हणाले आहे.

या अर्थसंकल्पाला जुमलेबाजी म्हणता येईल. महिलांना न्याय मिळाला नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि बेरोजगारांना देखील न्याय मिळाला नसल्याचं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं. त्यामुळे आताच्या सरकारने बेरंग अर्थसंकल्प मांडला आहे. जनतेशी या सरकारला काहीही देणघेणं नाही. पैसे, उत्पनाचा स्त्रोतच नाही तर या घोषणा कशाप्रकारे केलेल्या आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं दानवे म्हणाले आहेत.

Web Title: Ambadas danve reaction about maharashtra budget 2023

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2023 | 05:15 PM

Topics:  

  • Budget
  • budget 2023
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
1

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण
2

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात
3

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
4

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.