Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संत गाडगेबाबांचे कार्य प्रेरणादायी, आर. एस. राव यांचे प्रतिपादन; गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम

संत गाडगेबाबांचे कार्य हे जगजाहीर आहे आणि नुकतीच अमरावती येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असल्यामुळे अनेक कार्यक्रम कऱण्यात आले. यावेळी आर. एस. राव यांनी गाडगेबाबांविषयी मत मांडले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 23, 2025 | 10:37 PM
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अमरावतीमध्ये कार्यक्रम

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त अमरावतीमध्ये कार्यक्रम

Follow Us
Follow Us:

अमरावती: संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या जीवनातून स्वच्छता, समाजसेवा आणि मानवतावाद यांचा आदर्श घालून दिला. गावोगावी जाऊन त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि दारू, अंधश्रद्धा व सामाजिक दुर्गुणांविरुद्ध जनजागृती केली. भिक्षेतून मिळालेल्या पैशांतून त्यांनी धर्मशाळा, शाळा, रस्ते व विहिरी उभारण्याचे कार्य केले. कर्मकांडाला विरोध करून त्यांनी माणुसकी, समता आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. समाजातील उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी अविरतपणे कार्य केले. स्वच्छता, समाजसेवा आणि समतेचा संदेश देणारे गाडगेबाबांचे कार्य आजच्या समाजासाठी, तरुण पिढीसाठी आणि विषेशतः विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रा. पी. आर. एस. राव यांनी केले.

तक्षशिला विधी महाविद्यालय येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्याम तंतरपाळे तर अतिथी म्हणून प्रा. डॉ. राजेश देशमुख, प्रा. अॅड. विशाखा सोनटक्के, प्रा. अॅड. भारत ढोके, अॅड. हरीश निभाळकर, अॅड. उज्वल सोनवणे, प्रा. स्वप्नील मानकर, प्रा. मेघा चिमणकर, प्रा. ज्योती टाले, प्रा. राधा काळे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश म्हस्के, सह प्रा. दीपाली पडोळे, प्रा. डॉ. अंभोरे, प्रा. डॉ. खेडकर, प्रा. डॉ. शुद्धोधन कांबळे प्रा. दीपाली गवई आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. राव म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा हे दोघेही राष्ट्राच्या समाजसुधारणेच्या परंपरेतील महत्त्वाचे समन्वयी व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेबांनी सामाजिक समता, मानवाधिकार, शिक्षण आणि संविधानिक मागनि अन्यायाविरुद्ध संघर्ष केला, तर गाडगेबाबांनी स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि करुणेच्या मूल्यांद्वारे समाजजागृती घडवली. बाबासाहेबांचा विचार बौद्धिक व संघटनात्मक पातळीवर क्रांती घडवणारा होता, तर गाडगेबाबांचे कार्य प्रत्यक्ष कृतीतून जनसामान्यांपर्यंत पोहोचले. जातिभेद, दारिद्रध आणि सामाजिक विषमता नष्ट व्हावी, हा दोघांचाही समान ध्यास होता. 

त्यामुळे विचारांची दिशा वेगळी असली तरी उद्दिष्ट एकच असल्याने बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यात वैचारिक व कृतीशील समन्वय स्पष्टपणे दिसून येतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रा. डॉ. तंतरपाळे महणाले, संत गाडगेबाबांचे विचार अत्यंत व्यवहार्य आणि समानाभिमुख होते. त्यांच्या मते खरे शिक्षण म्हणजे केवळ अक्षरज्ञान नव्हे, तर स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, नैतिकता आणि समाजसेवेची जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया होय. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजातील दुःख, अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे ते मानत.

संत गाडगे बाबा विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात होण्यासाठी समिती नेमावी; तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

संत गाडगेबाबांचे विचार व्यवहार्य

संत गाडगेबाबांचे विचार अत्यंत व्यवहार्य आणि समानाभिमुख होते. त्यांच्या मते खरे शिक्षण म्हणजे केवळ अक्षरज्ञान नव्हे, तर स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, नैतिकता आणि समाजसेवेची जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया होय. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजातील दुःखा, अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे ते मानत. सामाजिकतेच्या दृष्टीने शिक्षणाने माणूस माणसाशी जोडला गेला पाहिजे, भेदभाव नष्ट झाला पाहिजे आणि सेवाभाव विकसित झाला पाहिजे, असे प्रा. डॉ. तंतरपाळे म्हणाले.

सामाजिकतेच्या दृष्टीने शिक्षणाने माणूस माणसाशी जोडला गेला पाहिजे, भेदभाव नष्ट झाला पाहिजे आणि सेवाभाव विकसित झाला पाहिजे, प्रास्ताविक प्रा. दीपाली पडोळे यांनी केले. संचालन समीर वाघमारे यांनी केले. आभार दिव्या सगळे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांनी गाडगेबाबांच्या अंमलबजावणी करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, शिक्षक व शिक्षकेतर सर्व सहकारी आदींनी सहकार्य केले.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत जिल्ह्यात 15 नोव्हेंबरपर्यंत स्वच्छतेचा जागर : CEO मनिषा आव्हाळे

Web Title: Saint gadge baba s work is inspiring stated r s rao gadge baba death anniversary program at amravati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 10:37 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

अमरावती जिल्ह्यात 367 शाळा एकशिक्षकी; गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होतोय परिणाम
1

अमरावती जिल्ह्यात 367 शाळा एकशिक्षकी; गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होतोय परिणाम

Jalgaon News: ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी; ७८२ शेतकऱ्यांना मिळणार २४ लाखांहून अधिक रक्कम
2

Jalgaon News: ऊस उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी; ७८२ शेतकऱ्यांना मिळणार २४ लाखांहून अधिक रक्कम

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
3

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा
4

Karmala News: करमाळ्यात दुर्दैवी घटना! विहिरीत पडून माय-लेकराचा अंत; गावावर शोककळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.