मुंबई-अमरावती विमानसेवेला वाढता प्रतिसाद मिळाल्याने Alliance Air ने आठवड्यातील उड्डाणे चारवरून पाच दिवसांपर्यंत वाढवली आहेत. २९ मार्चपासून रविवार ते बुधवार आणि शुक्रवार असे पाच दिवस सेवा उपलब्ध असेल.
Amravati जिल्ह्यात चिकनच्या वादातून 12 वर्षीय मुलाची मावस भावाने हत्या केल्याचे उघड झाले. सुरुवातीला अपघाताचा बनाव करण्यात आला होता. पोलिस तपासात सत्य समोर येत आरोपीसह मृताच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले.
अमरावती येथील निर्मल उज्ज्वल बँकेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेत गहाण ठेवलेले १३ लाख रुपये किमतीचे १६६ ग्रॅम सोने बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस…
नवनिर्वाचित महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नवनिर्वाचित सदस्य अस्वच्छतेच्या प्रश्नांवर चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रितपणे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
पश्चिम महाराष्ट्रासाठी अहोरात्र वीजपुरवठा होत असताना दुसरीकडे विदर्भासाठी १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर भारनियमनाचे जोखड कायम असल्याने दाद मागावी तरी कुणाकडे?
अमरावती जिल्ह्यात एसटी बस आणि प्रवासी ऑटोमध्ये झालेल्या भीषण अपघातात शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना नागपूरला हलवण्यात आले असून पोलिसांनी पुढील…
भारताला २०३० पर्यंत बालविवाहमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून, २०२६ पर्यंत देशातील बालविवाहाचे प्रमाण सध्याच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी करणे आहे.
सध्या कापूस वेचणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र ग्रामीण भागात मजुरांची उपलब्धता कमी होत असून वेचणीचा खर्च झपाट्याने वाढत आहे.
शेतशिवारात शाहनूर धरणाच्या कालव्यात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचे बिंग फुटले आहे. प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून मोठा खुलासा केला आहे.
लॉकडाऊनच्या कालवधीपासून शहरातून अल्पवयीन मुलं मुली बेपत्ता होण्याचे प्रकार घडत होते. 'नन्हे फरिश्ते' या विशेष मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण ८८ अल्पवयीन मुलांची सुरक्षित सुटका केली आहे.
मंगळवारपासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली नाशिक विभागात 285 केंद्रावर एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून सामोरे जात आहेत. अकोला व बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी एक विद्यार्थी पकडला गेला.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करण्याची गरज पडू नये, यासाठी केंद्र सरकारने ई-रक्तकोश पोर्टल तयार केले. या पोर्टलवर सर्वच जिल्ह्यांतील रक्तपेढ्यांची नोंदणी केली जाणार आहे.
एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आहे.
शाळकरी विद्यार्थी, शेतमजूर, कामगार व नोकरदारांची वर्दळ सुरू असतानाच उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे बोगद्यात तीव कंपन जाणवू लागले. काही क्षणांतच बोगद्याच्या स्लॅबचा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
अमरावतीत 15 दिवसांपासून निवडणुकीच्या धामधुमीत घंटागाड्याच फिरकल्या नसल्याने नागरिकांच्या घरात कचरा साठून राहिला आहे.तसेच मोकळ्या जागा तसेच कंटेनरच्या आसपास कचरा दिसून येत आहे.
अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांतील शासकीय व खासगी व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये दाखल झालेल्या हजारो व्यसनींना यशस्वी उपचारांमुळे पुन्हा नव्या आयुष्याची संधी मिळाली आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आलेत. यात पंचवटीकडून नवसारीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी कठोरा नाका- रंगोली लॉन कटोरा जकात नाका या मार्गाचा वापर करावा.
ब्लॉकच्या कालावधीत काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. ट्रेन क्रमांक १२१०३ पुणे-लखनऊ एक्सप्रेस ११, १३ आणि २० जानेवारी रोजी दीड ते दोन तास उशिराने सुटेल
येत्या दोन दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दिग्गज नेत्यांच्या सभांनी शहरातील राजकीय वातावरण तापले महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आहे. १५ जानेवारीला अमरावती मतदान होणार आहे.
नायलॉन मांजा वापरून पतंग उडवणे जीवघेणे आणि पर्यायवरणासाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्यावर बंदी असून वापरणाऱ्यांवर आणि विक्रेत्यांवर मोठा दंड, तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.