Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास…; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहीष्कार घालण्याची घाेषणा प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 09, 2025 | 12:08 PM
शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास...; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा

शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास...; शेतकरी हक्क परिषदेतून बच्चू कडू यांचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहीष्कार घालण्याची घाेषणा प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. आश्वासनांची पुर्तता न करता हे राज्य सरकार जात आणि धर्माच्या आधारावर मतांचे विभाजन करीत असल्याचा आराेपही त्यांनी केला. शुक्रवारी पुण्यात झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत कडू यांनी ही भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार कैलास पाटील, बाळासाहेब देशमुख, शेतकरी नेते अजित नवले, अनिल घनवट आणि पत्रकार रमेश जाधव उपस्थित होते. कडू यांनी घेतलेल्या भुमिकेवर परीषदेची दिशा पुढील बैठकीत ठरविली जाईल असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. तर निवडणुकीवर बहीष्कार टाकण्याचा निर्णय वैयक्तिक असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बाेलण्याऐवजी सत्ताधारी पक्षांनाा जात-धर्माच्या आधारावर मतांचे विभाजन करायचे असल्याचा आराेप कडू यांनी केला. ते म्हणाले, ‘‘तरुणांची दिशाभूल करून राजकारणाच्या खेळात त्यांना ओढले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता फूट पाडणारे प्रचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत आम्ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही. खेड्यापाड्यातील तरुणांना मतांसाठी तोडले जाईल. त्याला शेतकरी बळी पडतील सध्याचे राजकारण वाहत गेले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रित होण्याची गरज असल्याने हा निर्णय घेतला आहे.”

कडू यांनी यापूर्वी रायगड व मोझरी येथे कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. “शेतकऱ्यांची मते विभागली जाऊ नयेत, त्यांच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्र यावे, यासाठी हा बहिष्कार हे आमचा ‘ब्रह्मास्त्र’ ठरेल,” असेही कडू म्हणाले.

काेण काय म्हणाले ?

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे शेतमालाला हमीभाव देणे, ही महायुती सरकारची आश्वासने हवेत विरली आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्यापक जनआंदोलन उभारण्याच्या अनुषंगाने या परिषदेत चर्चा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व संघटना एका मंचावर येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठीचा कृती आराखडा तयार करतील त्यासाठी अधिवेशन घेऊन राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली जाईल. त्यात निवडणुकीवरील बहिष्कार बाबतही चर्चा केली जाईल, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

सर्व राजकीय पक्षांनी राजकीय जोडी बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकजूट झाले पाहिजे.

– आमदार कैलास पाटील

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकरी हिताची पिक विमा योजना लागू करावी, यासह विविध मुद्द्यांवर सर्व शेतकरी संघटनांचा किमान समान कार्यक्रम तयार करून शेतकऱ्यांच्या आगामी अधिवेशनात ठराव केले जातील,

– अजित नवले.

Web Title: Bachchu kadu has warned the state government over the loan waiver for farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 12:08 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी
1

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा
2

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
3

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात
4

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.