भाजपाकडून माझ्या वक्तव्याची मोडतोड करून "ध" चा "मा" करून राज्यात दंगली घडवायच्या आहेत, याचा प्रत्यय आज पुण्यात आला, असे प्रत्युत्तर हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला दिले आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या महिला भाविकांच्या संरक्षणासाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. तथाकथीत विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू असतानाच आता पुणे पोलिसांनी नियभंग करणाऱ्यांची सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या नागरिकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे.
राहू–खामगाव आणि खडकी–देऊळगावराजे जिल्हा परिषद गटात आमदार कुल यांनी भाजपकडून उभे केलेले उमेदवार पराभूत झाल्याने, कुल यांचा तथाकथित ‘मास्टर स्ट्रोक’ सपशेल फसल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिकवली आहे. या परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे केवळ एक गुंठा जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महसूल देणाऱ्या प्रमुख मार्गांवर महामंडळाच्या बसेसऐवजी कंत्राटदारांच्या बसेस धाववल्या जात असल्याने पीएमपीएमएलला तोटा आणि खासगी ठेकेदारांना फायदा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम कासवगतीने सुरू असल्याने, महापालिका प्रशासन आता आक्रमक झाले आहे.