NCRB च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रात दर 5 मिनिटाला एक अनैसर्गिक मृत्यू होत आहे. या भयावह आकडेवारीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर 'जंगलराज' असल्याची टीका केली आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता वाहनचालकांसाठी ‘वीकेंडची शिक्षा’ ठरू लागला आहे. प्रत्येक शनिवार-रविवारी महामार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता नित्याची बाब झाली आहे.
शेतकरी संघटनेचे नेते अजित नवले, अनिल घनवट, कैलास तवार यांनी देखील उसाच्या एफआरपीमध्ये केवळ शंभर रुपये वाढ, ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचे म्हटले आहे.
पत्नीला कोम्बिंग ऑपरेशन ड्युटी आहे असे खोट सांगून प्रत्यक्षात पबमध्ये महिलेबरोबर मजा मारत असताना पती सापडल्यानंतर पत्नीचा छळ करणार्या पोलिस हवालदाराला निलंबीत करण्यात आले आहे.
दररोज एक बलात्कार होत आहे. ड्रग्जचा खुलेआम धंदा सुरु आहे. गुलटेकडी मार्केट यार्डात गुंडांचा हस्तक्षेप वाढला आहे, याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत का? असा संतप्त प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला…
Pandharpur Development Plan: पंढरपूरच्या विकासासाठी ४१५०.४६ कोटींच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. मंदिर कॉरिडॉर आणि भाविकांच्या सुविधांसाठी ३० महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
आंबेगाव तालुक्यात घरगुती गॅसपुरवठ्यात शहरी व ग्रामीण भागात मोठी तफावत निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढली आहे. ग्रामीण भागात ४५ दिवसांनी सिलिंडर वितरित केला जात आहे.
'पिंक ई-रिक्षा' योजनेत सुमारे ४०० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा धक्कादायक आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायत व पिंक रिक्षा महिला चालक-मालक संघटनेने केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाला स्व. अजित अनंतराव पवार यांचे नाव देण्याबाबत शिक्कामोर्तब होणार का, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
नसरापुरमधील घटनेवरुन काँग्रेस पक्षही आक्रमक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
राज्यातील शिक्षण व्यवस्था ढासळत असताना सरकार मात्र हातावर हात धरून बसल्याचा संताप व्यक्त करत सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाने आता थेट संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत.