धाराशिव तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दौंड तालुक्यातील वरवंड येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे या तलावातील माती आणि मुरूम उत्खनन करण्यासाठी स्थानिक माफियांनी सपाटा लावला आहे.
पॉस (POS) मशीनवरील नोंद आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने पुणे जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने निलंबित केले आहेत.
आंबेगाव तालुक्यात सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदारसंघातून गायब असल्याची चर्चा रंगत असतानाच ते ‘मिसळ पार्टी’त दिसल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खमंग पण तितकीच संतप्त चर्चा रंगली आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑक्टोबर-2025 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. अंड्यांची आंतरराष्ट्रीय निर्यात ठप्प झाल्याने स्थानिक बाजार पेठेत आवक वाढली असून, दरात मोठी घसरण झाली आहे.
कणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कृषी आयुक्तांनी कठोर पावले उचलावीत, अशी आक्रमक मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
येवला तालुक्यात पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांनी ३३४ रुपये हप्ता भरूनही केवळ १८३ रुपयांची भरपाई मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसानभरपाईसाठी शासनाकडे मागणी करण्यात येत आहे.
Maharashtra News: जानेवारी ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण १,४५,६०६ हेक्टरखालील शेतीचे नुकसान झाले असून २,३३,८९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून सुमारे 28 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
आंबेगाव तालुक्यात पुन्हा गुरुवारी आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कांदा काढणी सुरू असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली.