Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा ‘विळखा’; पाण्याला दुर्गंधीयुक्त हिरवा तवंग

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या भीमा नदीला सध्या प्रदूषणाने ग्रासले आहे. कधी काळी काचेसारखे चमकणाऱ्या पाण्याचा रंग पार बदलून गेला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2024 | 02:28 PM
चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा ‘विळखा’; पाण्याला दुर्गंधीयुक्त हिरवा तवंग
Follow Us
Follow Us:

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या भीमा नदीला सध्या प्रदूषणाने ग्रासले आहे. कधी काळी काचेसारखे चमकणाऱ्या पाण्याचा रंग पार बदलून गेला आहे. पिण्यासाठी तर सोडाचं पण हे पाणी आता काही दिवसांत शेतीसाठी सुद्धा उपयोगी राहणार नाही, असे मत काही जलप्रदुषणावर अभ्यास करणाऱ्या जलतज्ञांनी व्यक्त केले आहे.

जिल्ह्याची वरदायिनी भीमा नदी आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे नंदनवन उजनी धरणामुळे झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले असून, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. तर हेच उजनी धरण शेतकऱ्यांच्या अर्थिक प्रगतीचा कणा बनले आहे. म्हणून उजनीला शेतकऱ्यांसाठी वरदायनी म्हटले जाते.

पुणे जिल्ह्यातील भीमेच्या उगमापासून अनेक नद्या एकत्र येऊन भीमा सारखी महाकाय नदीचे रुप उदयाला आले. यातील काही नद्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून येतात. ही दोन्ही शहर देशात उद्योग आणि शहरीकरणात झपाट्याने वाढलेली शहरे म्हणून यांची ओळख आहे. या शहरांचे नागरीकरण जेवढ्या झपाट्याने झाले, तेवढ्याचं झपाट्याने उद्योगही वाढले.

ही सर्व क्रांती होत असताना नद्यांचे नाले कधी झाले हे प्रशासनाच्या लक्षात आलेच नाही. किंबहुना त्याकडे लक्षच दिले नाही. उद्योगाचे आणि नागरिकरणातील अशुद्ध पाणी थेट नदी पात्रात मिसळते. दररोज सुमारे दीडशे ते दोनशे मेट्रीक टन मलमुत्र नदीच्या माध्यमातून उजनीच्या पाण्यात येते. वास्तविक पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरापुरते आता नागरीकरण मर्यादित राहिलेले नाही. तर ते आता पुण्याच्या चाळीस किलोमीटर परिसरात पसरले आहे. रोजच्या रोज नागरिकरणात होत असलेली वाढ आणि त्यापासून होणारे प्रदूषण चिंता करणारे आहे.

दुषित पाण्यामुळे मच्छिमारांना त्वचा रोगाची समस्या

भीम नदी पाण्याच्या प्रदूषणाची पातळी एवढी वाढली आहे की, पाण्याला दुर्गंधी येते. नदीमध्ये भाविक भक्तांनी अंघोळ केली तर सर्व अंगाला खाज येते तसेच शरीराला लालाचट्टे पडून बारीक पुरळ येतात. मच्छिमारांच्या हातांना व पायाला जखमा होऊ लागल्या आहेत. शेतजमिनीवर तेलाचे तवंग दिसतात तर पाण्यात मलमुत्रापासून तयार झालेल्या गॅसच्या बुडबुड्या दिसतात. भीमा नदीवरील वाढते पाणी प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे.

नदीच्या पाण्यावर पुण्यासह बारामती व भीमा नदी परिसरातील मातब्बर राज्यकर्त्यांनी अनेक उद्योगधंदे, साखर कारखाने, केमिकलयुक्त कंपन्या व इतर छोटे-मोठे उद्योग आणून बसवले आहेत. संबंधित कंपन्यांमधून निघणारे प्रदूषित पाणी मोठ्या टाकीत साठवून ठेवून पावसाळ्यात नजीकच्या ओढ्या नाल्यांना सोडून दिले जाते. ते प्रदूषित पाणी नंतर नदीच्या पाण्यात मिसळून प्रदूषण वाढल्याने हे पाणी पशुपक्षी तसेच प्राणी व माणसाला पिण्यायोग्य झाले असून, आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

चंद्रभागा नदीच्या पाण्याचे काही शास्त्रज्ञांनी संशोधन केले असता प्रत्येकी ३० व्यक्तींपैकी एका व्यक्तीस कॅन्सर असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तरी यावरती प्रशासनाने त्वरित पाऊले उचलावीत असे सर्वसामान्य नागरिकांनी मत व्यक्त केले आहे. नदीपात्रात केमिकलयुक्त रसायन व पाणी सोडणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Bad water in chandrabhaga river due to pollution stinking green tawang to the water nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2024 | 02:28 PM

Topics:  

  • Chandrabhaga river
  • cmomaharashtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.