नवनिर्वाचित महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नवनिर्वाचित सदस्य अस्वच्छतेच्या प्रश्नांवर चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रितपणे प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
ग्रामीण भागातील विविध विकासकामांमध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर करून, निकृष्ट कामे करून शासनाचा निधी अपहार केला जात असल्याची गंभीर तक्रार नागरिकांकडून होत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडलेल्या असताना आता सर्वच ग्रामपंचायतची मुदत दोन तीन दिवसात संपणार आहे. स्थानिकांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक लोकप्रतिनिधी आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रासाठी अहोरात्र वीजपुरवठा होत असताना दुसरीकडे विदर्भासाठी १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर भारनियमनाचे जोखड कायम असल्याने दाद मागावी तरी कुणाकडे?
नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या या रस्त्याचे आठ पदरी रूंदीकरण व दोन्ही बाजुंनी समांतर रस्त्यासाठी २९० कोटीचा प्रस्ताव पाठविला होता.
काही प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उसाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. परिणामी २०२५-२६ हंगामात देशातील साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच फिल्डींग लावण्यास सुरूवात केली असून, त्यातही आघाडीवर नाव असलेल्या माधुरी बोलकर व मच्छिंद्र सानप यांनी स्वतंत्रपणे भेट घेण्याचे ठरविले आहे.
उत्तर भारतातील मैदानी भागात थंडी हळूहळू कमी होत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज दिल्लीतील कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ऋतूचक्राचा लपंडाव पाहायला मिळत आहे. पहाटे अंगाला झोंबणारा गारवा आणि दुपारी घामाच्या धारा काढणारे ऊन, अशा विचित्र हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत.
महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर महापाैर मंजुषा नागपुरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात आयुक्त नवल किशाेर राम यांना आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
भारताला २०३० पर्यंत बालविवाहमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून, २०२६ पर्यंत देशातील बालविवाहाचे प्रमाण सध्याच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी करणे आहे.
पुण्यातील एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मुलीच्या हिताचा सर्वांगीण विचार करत तिचा ताबा आईकडेच राहणे योग्य आहे, असे नमूद करत ६ वर्षांच्या मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास नकार दिला आहे.
२०२८ मधील राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित होण्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गांधीनगर येथील इंडिया स्किल स्पर्धेत हा प्रस्ताव मांडला, ज्याला केंद्राने सकारात्मक संकेत दिले आहे.
वाचनालयाच्या तिजोरीत सापडलेल्या या सोन्याच्या नाण्याच्या एका बाजूला 'श्री राजा शिव' अशी अक्षरे कोरलेली असून दुसऱ्या बाजूला 'छत्रपति' असा मजकूर आहे. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी चलन चलनात आले.