Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीमाशंकर अभयारण्य ३० सप्टेंबर पर्यंत पर्यटकांसाठी बंद; वनविभागाची माहिती

पुण्यात सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसाळ्यात पुण्यातील भीमाशंकर अभयारण्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र, पावसाळ्यात हा परिसर धोकादायक होत असल्याने भीमाशंकर अभयारण्य ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2024 | 03:31 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातील पर्यटनाचं खास आकर्षण असलेलं भीमाशंकर अभयारण्य व श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. पावसाळ्यातील पर्यटनासाठी भीमाशंकर अभयारण्य व श्री क्षेत्र भीमाशंकर खास आकर्षण ठरतं. या अभारण्यात असणारे अनेक धबधबे पाहण्यासाठी पर्यटक या अभयारण्याला भेट देतात. मात्र आता ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत भीमाशंकर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. याबाबत उपवनसंरक्षक (वन्यजीव) तूषार चव्हाण यांनी माहिती दिली आहे.

पुण्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे भीमाशंकर अभयारण्य परिसरातील रस्ता धोकादायक होतो. त्यामुळे ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत भीमाशंकर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आले असल्याचे वन विभागानं सांगतिलं आहे. वनपरिक्षेत्र भिमाशंकर अभयारण्य – १ तसेच वनपरिक्षेत्र भिमाशंकर अभयारण्य-२ मधील धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा व खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

भिमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना पर्यटनावेळी नियमांचे काटेकोर पालन करावं लागेल, तसेच पर्यटकांना प्रशानसनाला सहकार्य करावं लागेल. भिमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी अवैधरित्या अभयारण्यामध्ये प्रवेश करू नये. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायदया अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपवनसंरक्षक वन्यजीव पुणे यांनी दिला आहे.

भीमाशंकर प्रमाणेच नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प देखील आजपासून पुढील ३ महिने पर्यटनासाठी बंद राहणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील खास आकर्षण म्हणून ओळखला जाणारा नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प आजपासून पुढील ३ महिने पर्यटनासाठी बंद राहणार आहे. नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांना ३० सप्टेंबरपर्यंत नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांचे दर्शन होणार नाही. पावसाळ्यात जंगलातील अंतर्गत रस्त्यांवर पर्यटकांची वाहने चालविणं धोकादायक ठरू शकतं. तसेच पावसामुळे जंगलातील प्राण्यांचं दर्शन देखील होत नाही. याच पार्श्वभूमीवर नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी ३ महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Bhimashankar sanctuary closed for tourists till september 30 information from forest department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2024 | 03:31 PM

Topics:  

  • Forest Department
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.