Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीतील काही गावं कर्नाटकला देण्याचा भाजपाच कट, सुषमा अंधारेंचा भाजपावर खळबळजनक आरोप

जत तालुक्यातील काही गावांना कर्नाटक सरकारने पाणी दिले आहे. तसेच या तालुक्यातील काही गावं कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर व भाजपावर निशाना साधला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सीमा प्रश्नी भाजपावर खळबळजनक आरोप केला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 02, 2022 | 05:14 PM
सांगलीतील काही गावं कर्नाटकला देण्याचा भाजपाच कट, सुषमा अंधारेंचा भाजपावर खळबळजनक आरोप
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली जात आहे, सीमा प्रश्नावर महाराष्ट्रातील लोकांच्या भावना तीव्र आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यातील सरकार बैठका घेत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra karnatak) वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र कर्नाटकच्या भूमिकेवर राज्यातीव तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच केंद्रातील व राज्यातील भाजपाला (BJP) लक्ष्य केलं जात आहे.

[read_also content=”राज्यपालांच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी केलं ‘हे मोठं’ वक्तव्य, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/ajit-pawar-big-statement-about-governor-resignation-350323.html”]

दरम्यान, जत तालुक्यातील काही गावांना कर्नाटक सरकारने पाणी दिले आहे. तसेच या तालुक्यातील काही गावं कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर व भाजपावर निशाना साधला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सीमा प्रश्नी भाजपावर खळबळजनक आरोप केला आहे. सांगलीतील काही गावं कर्नाटकला देण्याचा भाजपाच कट आहे, असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाजपावर खळबळजनक आरोप केला आहे. केंद्रात व कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार आहे. त्यामुळं सांगलीतील काही गावं ही कर्नाटकच्या स्वाधीन करण्याचं षडयंत्र भाजपा रचत आहे.

कारण भाजपाला सीमावादावर तोडगा काढायचा नाहीय. तसेच सांगलीतील काही गावं ही कर्नाटकला द्याची आहेत. म्हणून भाजपा यावर काही भूमिका घेत नसल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी भाजपावर केला आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील भाजपा नेते बोलण्यासाठी स्किप्ट देतात, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता सुषमा अंधारेंनी भाजपावर सीमा प्रश्नी दुसरा गंभीर व खळबळजनक आरोप केला आहे. कर्नाटकने सांगलीतील काही गावांना पाणी सोडल्यानंतर महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी जतच्या 42 गावांच्या पाणी प्रश्नाबाबत तातडीची बैठक बोलावली आहे.

Web Title: Bjp is plotting to give some villages in sangli to karnataka sushma andhare accusation on bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2022 | 05:14 PM

Topics:  

  • Basavaraj Bommai
  • maharashtra
  • sangali
  • sushma andhare

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.