Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ; वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता

बेपत्ता व शोषित मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी राज्यात २०१५ ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण १३ ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 25, 2026 | 09:46 AM
धक्कादायक ! महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ; वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता

धक्कादायक ! महिलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ; वर्षभरात तब्बल 48278 महिला बेपत्ता

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात २०२५ मध्ये एकूण ४८ हजार २७८ महिल्या हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तत्पूर्वी २०२४ मध्ये ही संख्या ४५ हजार ६६२ इतकी होती. यात अल्पवयीन मुलींची संख्याही अधिक आहे. २०२५ आणि २०२४ मध्ये अनुक्रमे १२ हजार ११३ अल्पवयीन मुली आणि ११ हजार ३१६ इतक्या अल्पवयीन मुली हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हरविलेल्या एकूण महिल्यांपैकी २०२४ ला ३० हजार ८७७ आणि २०२५ मध्ये ३६ हजार ५८१ महिला मिळून आल्या आहेत.

विधानसभेत लेखी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात विशेषत; मुंबई, नवी मुंबई, रायगड, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर शहरातील अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याबाबत आमदार मंगेश कुडाळकर, प्रशांत ठाकूर, मनिषा चौधरी यांच्यासह अनेक आमदारांनी यासंदर्भात लेखी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात वरील माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील लेखी उत्तर दिले आहे.

हेदेखील वाचा : Pandharpur Crime: संतापजनक! दोन अल्पवयीन मुलींवर अल्पवयीन मुलानेच केला अत्याचार; आरोपी ताब्यात

दरम्यान, बेपत्ता व शोषित मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी राज्यात २०१५ ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण १३ ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले आहेत. तर यंदाच्या वर्षात १४ ऑपरेशन मुस्कान सुरु असल्याचे यावेळी लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुले-मुली सापडण्याचे प्रमाण ९६ टक्के

या लेखी उत्तरानुसार, राज्यातील मुंबई शहर, नवी मुंबई, रायगड, नागपूर शहर आणि छत्रपती संभाजी नगर या पाच जिल्ह्यात २०१४- २०२५ रोजी एकूण ४ हजार ९८९ बालके हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ८१३ बालके मिळून आल्याची माहिती या उत्तराच्या निमित्ताने देण्यात आली आहे. या दोन वर्षात १४ ते १८ वयोगटातील हरवलेल्या मुला-मुलींपैकी ९६ टक्के पेक्षा जास्त मुले व मुली मिळून आल्या असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: As many as 48278 women went missing in a year in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • maharashtra
  • Missing Case

संबंधित बातम्या

पिंपरीत नवनियुक्त आयुक्तांचा ‘दणका’; अवैध बांधकामांना अभय देणाऱ्या दोन अभियंत्यांचे निलंबन
1

पिंपरीत नवनियुक्त आयुक्तांचा ‘दणका’; अवैध बांधकामांना अभय देणाऱ्या दोन अभियंत्यांचे निलंबन

Ahilyanagar News: महापालिकेच्या ‘पे अँड पार्क’ला कापड बाजार व्यापारी असोसिएशनचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा
2

Ahilyanagar News: महापालिकेच्या ‘पे अँड पार्क’ला कापड बाजार व्यापारी असोसिएशनचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा

खेड तालुक्यात भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
3

खेड तालुक्यात भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

“महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य, एसटीला सुद्धा भरीव निधी द्या”, एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी
4

“महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य, एसटीला सुद्धा भरीव निधी द्या”, एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.