मुंबई : महाराष्ट्राचे (Maharashtra) तीन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच हा सगळा अट्टाहास सुरु आहे, असा असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. महाराष्ट्रात अनेक भागांत पूरस्थिती (Flood Situation) उद्भवली; पण मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. अमित शाह (Amit Shah) यांचा आमच्यावरही दबाव (Pressure) आहेत. पण दबावाला बळी पडून ज्यांना जायचंय ते जात आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील काही खासदारांच्या घरांवर चौकी पहारे लागलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त अचानक काही खासदारांच्या घरांवर लावण्यात आला आहे. पोलीस बळ, केंद्रीय यंत्रणा, पैशांचा वापर केला जात असून ब्लॅकमेलिंगही होत आहे. जो होगा वो देखा जायेगा. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला, सामना करायला, लढा द्यायला, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार आहे, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर त्यांची रुटिन व्हिजिट आहे. कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे हायकमांड इथे आहे, म्हणून त्यांना दिल्लीत यावे लागते. मंत्रिमंडळ स्थापन करायचे आहे. कारण शिवसेनेचे मुख्यमंत्री मी पाहिलेत दोन. एक मनोहर जोशी, दुसरे नारायण राणे. पण त्यांना मी कधी दिल्लीत आल्याचे पाहिले नाही. त्यांच्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईतच होत होत्या, अशी टीका राऊत यांनी केली.
दोन हात करण्यासाठी आम्ही समर्थ
लढाई कोणतीही असू द्यात; चिन्हाची, पक्षाची कोणतीही. मी तुम्हाला सांगतो की, कोणत्याही लढाईशी दोन हात करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. मी कालही आपल्याला सांगितले, ज्या पद्धतीने छुपे वार सुरु आहेत, जसे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे भाजपचे नेतेच सांगतात. जर महाराष्ट्राचे तुकडे करायचे असतील तर आधी अखंड शिवसेना फोडा, शिवसेनेचे तुकडे करा. पण शिवसेनेच्या चिन्हावर किंवा शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आलेले आमदार आणि खासदार आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहिल, असे राऊत म्हणाले.